शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

वीज तुटीचा फटका शेतकऱ्यांना !

By admin | Published: May 14, 2017 4:04 AM

सिंचनासाठी शेतकरी रात्री शेतात

बुलडाणा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला असून, याचा फटका मात्र शेतकर्यांना बसत आहे. महावितरणने कृषी पंपांना देण्यात येणार्या विजेत कपात केली असून, दिवसा वीज पुरवठा बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू करण्यात येत आहे. दरवर्षी राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यामुळे तुटवडा निर्माण होतो. यावर्षीही विविध कारणांमुळे विजेच्या मागणी आणि पुरवठय़ात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरणच्यावतीने भारनियमन करण्यात येत आहे. मात्र, भारनियमन करीत असताना नागरी वस्तीला जास्तीत जास्त वीज देण्याचे धोरण अवलंबविण्यात आले असून, कृषी पंपांना वीज देण्याला दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. सध्या शेतांमध्ये संत्रा, पपई, मोसंबी, डाळिंब, केळी ही फळपिके आहेत. तसेच उन्हाळी पीकही शेतकरी मोठय़ा प्रमाणात घेत आहेत. वर्हाडात मोठय़ा प्रमाणात संत्र्याचे पीक घेतले जाते. उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. या झाडांना पाणी मिळाले नाही, तर वर्षानुवर्षांपासून वाढविलेली झाडे सुकतात व शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. महावितरणच्यावतीने मात्र कृषी पंपांना वीज देण्याला दुय्यम स्थान देण्यात आले असून, भारनियमनात वाढ करण्यात आली आहे. विजेचे नियोजन करण्यासाठी कृषिग्राहकांच्या वीज उपलब्धतेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कृषी पंपांना कमी प्रमाणात वीज देण्यात येत असून, दिवसभर वीज पुरवठा बंद असतो, तर रात्रीच्या वेळी वीज देण्यात येते. वीज स्थिती बदलताच कृषी पंपांना दिवसा आठ तास व रात्री १0 तास वीज पुरवठा करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.महावितरणला महानिर्मितीसह विविध स्रोतांकडून वीज पुरवठा होतो. परंतु विविध कारणांमुळे सुमारे चार हजार मेगावॉटपर्यंत विजेची उपलब्धता कमी असतानाही महावितरणने १५00 मेगावॉटपर्यंत आवश्यकतेनुसार भारनियमन केले आहे.राज्यातील काही संच तांत्रिक कारणांमुळे बंद असून, सदर संच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासोबतच इतर स्रोतांमधूनही विजेची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले तात्पुरते भारनियमन लवकरच बंद करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.