शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
2
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
3
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
4
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
5
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
8
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
9
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
10
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
11
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
12
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
13
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
14
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
15
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
16
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
17
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
18
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
19
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
20
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

वीज रोहित्र बनले धोकादायक!

By admin | Published: June 19, 2017 4:28 AM

उघड्या रोहित्रांकडे वीज कंपनीचे दुर्लक्ष; शॉर्ट सर्किटची समस्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहर व ग्रामीण भागात वीज खांबावर लावण्यात आलेले विजेचे रोहित्र उघडे असतात. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोकाट जनावरांसह नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे वीज कंपनीच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीकडून शहरातील जवळपास सर्व वीज खांब व त्यावरील वीज रोहित्रांची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या एकच महिन्यात पुन्हा वीज रोहित्रांची परिस्थिती जैसे थे झाली. आज शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरील विजेचे रोहित्राच्या पट्या उघड्या आहेत. रोहित्र जमिनीपासून अगदी काही फुटावर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे यातील जिवंत वीज तारा जमिनीपर्यंंंत लोंबकळताना दिसतात.याठिकाणी काही लघू व्यावसायिक आपली दुकाने थाटून बसतात. त्यांच्या जीवित्वास या रोहित्रामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा या रोहित्रामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगीचा मोठा भडका होतो. ग्रामीण भागात उघड्या वीज रोहित्रातून विजेचा धक्का बसून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही पुढे आल्या आहे. या शहरातील मुख्य रस्त्यावरील रोहित्रांना लोखंडाची पेटी आहे. या पेट्याचे लॉक तुटले असल्यामुळे शिवाय लाइमनच्या दुर्लक्षामुळे रोहित्र झाकणे नेहमीच उघडे राहतात. अशीच स्थिती ग्रामीण भागातही आहे.ग्रामीण भागातही बहुतांश खेडेगावात रोहित्र उघडेच राहते. संबंधित अधिकार्‍यांसह लाइमनचे सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या या हलगर्जीपणामुळे नागरिक व जनावरांचे जीवन धोक्यात आले आहेत.