शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रब्बी हंगामाची तयारी सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:51 IST

खामगाव : दिवाळी आटोपताच शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरु केली असून शेतमशागतीची कामे जोमात सुरु झाल्याचे दिसून येते. खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यातच शेतमालाला योग्य भाव सुध्दा मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता येणार्‍या रब्बी हंगामातून तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना वाटत आहे. 

ठळक मुद्देशेतमशागतीची कामे जोमात

खामगाव : दिवाळी आटोपताच शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरु केली असून शेतमशागतीची कामे जोमात सुरु झाल्याचे दिसून येते. खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यातच शेतमालाला योग्य भाव सुध्दा मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली होती. आता येणार्‍या रब्बी हंगामातून तरी चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना वाटत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी प्रचंड निराशाजनक ठरला. ना पावसाची साथ मिळाली ना शेतमालाला योग्य भाव. सुरुवातीला आवश्यकता असतानाच्या काळात पाठ फिरवणार्‍या पावसाने नंतर मात्र अवेळी हजेरी लावल्याने शेतमालाचे नुकसान झाले. त्यामुळे मालाचा दर्जा घसरला व नॉन एफएक्यू च्या नावाखाली कमी भावाने त्याची खरेदी करण्यात आली. परिणामी शेतकर्‍यांसाठी हा हंगाम नुकसानकारक ठरला. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी सुध्दा हंगाम सरल्यावर पदरात पडली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी पुरता खचलेला असताना रब्बी हंगामात उत्पन्न मिळविण्याची आशा त्याच्या मनात निर्माण झालेली आहे. याकरिता शेतकरी शेतमशागतीच्या कामाला भिडला असून ऐन दिवाळीच्या दिवसातही ही कामे करताना शेतकरी दिसून आला. गहू, हरबरा आदी रब्बीची पिके घेण्याची तयारी शेतकर्‍यांनी चालविली असून भाजीपाला पेरण्याचे नियोजन सुध्दा केले जात आहे. याकरिता ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे केली जात आहेत.

 

टॅग्स :agricultureशेती