शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

सध्याचे सरकार असंवेदनशील - माणिकराव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:42 IST

काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देसात नोव्हेंबर रोजी अमरावतीत येथे काँग्रेसचा जनआक्रोश  मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्याचे सरकार हे असंवेदनशील असून, शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना दिलासादायक असे काम या सरकारने  गेल्या तीन वर्षांत केलेले नाही. त्याविरोधात काँग्रेसने राज्यभरात  जनआक्रोष आंदोलन सुरू केले असून, अमरावती येथे सात  नोव्हेंबर रोजी जनआक्रोश मेळावा आयोजित करण्यात  आल्याची माहिती विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे  यांनी येथे दिली.काँग्रेस कार्यालयात आयोजित  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आ. राहुल बोंद्रे,  मेळाव्याचे समन्वयक श्याम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड,जि.प. सदस्य अँड. जयश्री शेळके,  माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, शैलेश सावजी, लक्ष्मणराव  घुमरे उपस्थित होते. कर्जमाफीची घोषणा करून पाच महिने झाले,  तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कुठलाही दिलासा नाही. अधिवेशना पर्यंत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यास आम्ही भाग पाडू,  असे ठाकरे यावेळी म्हणाले. कीटकनाशकामुळे शेतकर्‍यांचा मृ त्यू झाल्याप्रकरणी मूळ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,  यासह अन्य मागण्यांसाठी हा जनआक्रोश मोर्चा असल्याचे ते  म्हणाले. सोबतच संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांवरही कारवाई  करण्यात यावी, अशी  मागणी असल्याचे ते म्हणाले. वर्तमानात  समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.  वादग्रस्त राणी पद्मावती चित्रपटात वास्तव चित्रण असावे, जन तेच्या भावनांचा विचार करता वादग्रस्त सीन काढून टाकावे,  असेही ते म्हणाले. 

अधिवेशनावर काँग्रेसची दिंडी अधिवेशनादरम्यान काँग्रेस मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मार्गे  अधिवेशनावर दिंडी काढणार आहे. २६ किंवा २७  नोव्हेंबरदरम्यान या दिंडीस प्रारंभ होणार असल्याचे संकेत  माणिकराव ठाकरे यांनी दिले. याची अद्याप अधिकृत घोषणा  झाली नसली, तरी प्रदेश काँग्रेसतर्फे ती लवकरच करण्यात येणार  असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस