शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 11:43 AM

उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने उत्तरप्रदेशमध्ये पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.

बुलडाणा: लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून बुलडाणा जिल्ह्यात जलसंपदा, समृद्धी महामार्गासह पुण्या, मुंबईतून स्वगृही जाण्यासाठी निघालेल्या व बुलडाणा जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील ५०७ मजुरांना रेल्वेने उत्तरप्रदेशमध्ये पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.दरम्यान, प्रसंगी, सहा मे रोजी श्रमीक एक्सप्रेसद्वारे त्यांना अलाहाबादपर्यंत सोडले जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी व्यक्त केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ५४६ परराज्यातील मजूर अडकून पडले असून जिल्ह्यातील विविध कामामावर साडेचार हजारांच्या आसपास मजूर आहेत. यातील ज्या मजुरांनी स्वगृही जाण्यासाठीची इच्छा व्यक्त करून तशी आॅनलाईनची प्रक्रिया पुर्ण केली आहे, अशांपैकी पहिल्या टप्प्यात ५०७ मजुरांना उत्तरप्रदेशात पाठविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले असून त्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाहीही सध्या पुर्णत्वास गेली आहे. संदर्भीय विषयान्वये जिल्हाधिकारी कार्यालयात कामाचे नियोजन करण्यात आले असून काही नोडल अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वकाही सुरळीत पारपडल्यास सहा मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्टेशनवरून श्रमीक एक्सप्रेसद्वारे या ५०७ मजुरांना स्वगृही पाठविण्यात येईल. त्याबाबतची अधिकृतस्तरावरील घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र प्रशासनाचे तसे नियोजन सुरू झाले आहे.

राजस्थानातील ४४ जणही परतणारराजस्थानमधील ४४  जणही त्यांच्या स्वत:च्या खासगी वाहनाने राजस्थानमध्ये पोहोचणार आहेत. त्यासंदर्भातील वैद्यकीय तथा महसूल प्रशासनस्तरावरील कार्यवाही पूर्णत्वास गेली आहे. या संबंधीत ४४ जणांचे स्वत:चे वाहन असल्याने तशी त्यांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाUttar Pradeshउत्तर प्रदेशLabourकामगार