शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

अवघड क्षेत्रातील शिक्षकांना इच्छूक स्थळी बदलीचा अधिकार

By admin | Published: May 15, 2017 7:23 PM

बुलडाणा : जिल्ह्यात शिक्षण विभागाने कोणत्याही सुविधा नसलेल्या गावांना अवघड क्षेत्रात टाकले आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना जिल्ह्यात इच्छूक ठिकाणी बदलीचे अधिकार मिळाले आहेत.

हर्षनंदन वाघ / ऑनलाइन लोकमतबुलडाणा : जिल्ह्यात शिक्षण विभागाने कोणत्याही सुविधा नसलेल्या गावांना अवघड क्षेत्रात टाकले आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना जिल्ह्यात इच्छूक ठिकाणी बदलीचे अधिकार मिळाले आहेत. तर त्यांच्या ठिकाणी शिक्षकांची बदली करण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना आहे.शिक्षक बदलीच्या अनुषंगाने अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा परिसरातील शाळांच्या याद्या प्रशासनाने तयार केल्या आहेत. त्यामध्ये संग्रामपूर  तालुक्यातील सर्वात जास्त ९ शाळा अवघड क्षेत्रात नोंदल्या गेल्या आहेत. तर जळगाव जामोद तालुक्यातील ७ व खामगाव तालुक्यातील केवळ ३ शाळांची नोंद झाली आहे. शासनाने १५ मे २०१४ रोजी शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत शासन आदेश काढला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वसाधारण व अवघड गावे निश्चित करण्यात आले असून अवघड गावातील शिक्षकांची जागा रिक्त राहू नये किंवा अशा शिक्षकाला ३ वर्षानंतर बदलीची संधी मिळावी हा उद्देश शासनाचा नवीन धोरणाचा आहे. याशिवाय शिक्षकांच्या बदल्या तालुक्यांतर्गत होत होत्या. शासनाच्या नव्या आदेशानुसार आता शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण जिल्हास्तरावरून ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्यांचे पूर्ण अधिकार असणार आहेत. ज्या शिक्षकांनी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त अधिक काळ सर्वसाधारण क्षेत्रात सेवा बजावली आहे, त्यांची बदली अवघड क्षेत्रात केली जाणार आहे. तर ज्या शिक्षकांनी अवघड भागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावली आहे, त्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात  सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.बदल्यांची प्रक्रिया पाच टप्प्यातजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या पाच टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदापेक्षा कमी पदे रिक्त आहेत अशा शाळांमधील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात दुर्धर आजार असलेले तसेच अपंग, विधवा, कुमारिका, परित्यक्ता वा घटस्फोटित महिला व ५३ वर्षावरील शिक्षक यांची इच्छा असेल तरच विनंती बदली केली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पती-पत्नी एकत्रिकरणाअंतर्गत ३० किलोमीटर परिसरात संधी दिली जाणार आहे. मात्र दोघांपैकी एकजण बदलीपात्र असेल तरी दोघांमागे बदलीची अडचण येणार आहे.  चौथ्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर पसंतीक्रमांकानुसार केल्या जातील. अवघड क्षेत्रातील शिक्षकाची इच्छा असेल तरच ही बदली होईल. तर पाचव्या टप्प्यात "सर्वसाधारण" क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकाची सेवाज्येष्ठतेनुसार पसंतीक्रमाने बदली करण्यात येणार आहे. अर्थात अवघड क्षेत्रातील शिक्षकाने सर्वसाधारण शिक्षकाची जागा मागितली तरच सर्वसाधारण शिक्षकाची बदली होणार आहे.