शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

शेतक-याला दोन लाखांची नुकसानभरपाई

By admin | Published: August 28, 2015 12:17 AM

शॉर्टसर्किटने उसाला आग लागली होती; त्यामुळे दोन लाखांची नुकसानभरपाई देण्याचे महावितरण कंपनीला ग्राहक न्यायालयाचे आदेश.

बुलडाणा : महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील लोंबकळलेल्या तारांचे घर्षण झाल्याने उसाला आग लागून शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी पोटी-धानोरा येथील शेतकरी विक्रम पाटील यांना २ लाख २२ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक न्यायालयाने बुधवार, २६ ऑगस्ट रोजी दिला. धानोरा तालुक्यातील नांदुरा येथील शेतकरी विक्रम पाटील यांचे रसूलपूर शिवारात शेत आहे. या शेतात विक्रम पाटील यांनी ऊस लावला होता. त्यांच्या शेतात असलेल्या विद्युत डीबीच्या विजेच्या तारा लोंबकळत होत्या. यातील काही तारा उघड्या अवस्थेत होत्या. सदर डीबीला कुलूपसुद्धा लावलेले नव्हते. १७ मार्च २0१२ रोजी या उघड्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिगणी उडाली व उसाला आग लागला. यामध्ये विक्रम पाटील यांच्या साडेसात एकर शेतातील पीक जळून नष्ट झाले. या घटनेची तक्रार शेतकर्‍यांनी महावितरणला तसेच मलकापूर पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला; मात्र महावितरणच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याचीही तसदी घेतली नव्हती. याप्रकरणी सदर शेतकर्‍याने सबळ पुराव्यासह जिल्हा ग्राहक न्यायालयात दाद मागितली. अर्जदाराचा युक्तिवाद व दाखल केलेल्या सबळ पुराव्यावरून ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष विश्‍वनाथ ढवळे, सदस्य नंदा लारोकार, एम.बी. वानखेडे यांनी शे तकर्‍याच्या ऊस पिकाच्या नुकसानभरपाईपोटी २ लाख १0 हजार रुपये, त्यावर रक्कम देईपर्यंत नऊ टक्के व्याज तसेच शारीरिक व मानसिक त्रास दिल्याबद्दल सात हजार रुपये आणि कोर्ट खर्चापोटी पाच हजार रुपये असा २ लाख २२ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. शेतकरी विक्रम पाटील यांच्यातर्फे अँड. शरद राखोंडे यांनी काम पाहिले.