शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
3
"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत
4
"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल
5
अनोखी क्रिकेट स्पर्धा रिटर्न! ६ खेळाडू आणि ५ ओव्हर्स; भारताचा संघ जाहीर, केदार जाधवला संधी
6
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
7
दो जिस्म, एक जान... 'बिग बॉस मराठी' फेम निक्की-अरबाझचं रोमँटिक फोटोशूट, पाहा Photos
8
हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
9
HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी
10
ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... (Video)
11
महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा
12
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
13
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
14
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
15
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
16
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
17
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
18
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
19
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
20
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

रूईखेड मायंबा प्रकरणाचा मोर्चाद्वारे निषेध!

By admin | Published: June 17, 2017 12:22 AM

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : विविध संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रुईखेड मायंबा येथील चर्मकार समाजातील दलित महिलेला मारहाण करून तिची नग्न धिंड काढल्याच्या निषेधार्थ बुलडाणा शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुढाकाराने चर्मकार ऐक्य परिषदेच्या व इतर समविचारी संघटनेच्या सहकार्याने हजारोंचा मोर्चा १६ जून रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.यावेळी मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री नितीन राऊत, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बाबूराव माने, माजी आमदार राणा दिलीप सानंदा, चंद्रप्रकाश देगलूरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष मीरा शिंदे, भानुदास विसावे, लक्ष्मण घुमरे, भाई अशांत वानखडे, राज्याध्यक्ष माधव गायकवाड, सरोज बिसुरे, उमाकांत डोईफोडे यांच्यासह राज्यभरातील विविध मान्यवर उपस्थित होते. मोर्चापूर्वी गांधी भवन येथे भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांनी महिलेस न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याचे सुतोवाच करून चर्मकार ऐक्य हेच माझे स्वप्न आहे. व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे. हेच ऐक्य अखंड टिकवा, असे आवाहन त्यांनी केले. सरकारचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले. माजी मंत्री नितीन राऊत यांनी देशात भाजप सरकार आल्यापासून अन्याय, अत्याचार वाढल्याचे सांगितले. माजी आमदार बाबूराव माने यांनी चर्मकार ऐक्याचे स्वागत करून हे ऐक्य भविष्यात टिकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. लक्ष्मणराव घुमरे यांनी घटनेचा निषेध करून सर्वांनी एकत्र येऊन अशा घटनांचा विरोध करण्याचे आवाहन केले. दामोधर बिडवे यांनी बारा बलुतेदार महासंघातर्फे मोर्चाला जाहीर पाठिंबा देऊन अन्यायग्रस्त महिलेस न्याय देण्याची मागणी केली. समतेचे निळे वादळाचे भाई अशांत वानखडे यांनी सर्व बहुजनांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे सांगून आपली संघटना अशा घटनांचा निषेध करून न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहील याची ग्वाही दिली. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी समाजाच्या ऐक्याचे कौतुक करून सदर महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी समाजाने संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. भाई सुगदाने यांनी हा लढा केवळ चर्मकारांचा नाही तर सर्वांचा असल्याचे नमूद करून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे आवाहन केले. भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा संयोजक कुणाल पैठणकर यांनी झालेल्या अन्यायाची समीक्षा करताना बहुजन समाजातील ऐक्याचा अभाव हेच आमच्यावरील अन्यायाचे कारण आहे, यावर उपाय बहुजनांचे ऐक्याची वज्रमूठ बांधणे हाच आहे, असे सांगितले. मीरा शिंदे यांनी महिलांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठावे व प्रतिकार करण्याचे आवाहन केले. अशोक कानडे, संजय खामकर यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. चंद्रप्रकाश देगलूरकरांनी चर्मकार समाजाला फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार स्वीकारण्याचे आवाहन करून या घटनेचा निषेध केला. यावेळी संपूर्ण राज्यामधून चर्मकार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात मोर्चाचे मुख्य संयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानदेव काटकर यांनी घटनेची संपूर्ण माहिती कथन करून बुलडाणा जिल्हा जिजाऊंचे माहेरघर असताना या घटनेने संपूर्ण मानवजातीला कलंकित केल्याचा निषेध केला.