शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

By विवेक चांदुरकर | Updated: May 13, 2024 17:38 IST

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

विवेक चांदूरकर, संग्रामपूर : एका बाजूला वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असतांना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत.

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी ग्राम वसाली येथे गेल्या काही दिवसांपासून कुपनलिकेतील मोटर पंपात बिघाड झाला. नादुरुस्त झालेल्या पंपांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नसल्याने येथे पाण्याची समस्या उद्भवली. परीणामी येथील आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी रखरखत्या उन्हात वणवण भटकंती सुरू आहे. पाण्यासाठी महिलांचे प्रचंड हाल होत असून येथील पाणी प्रश्न गंभीर होत आहे. मात्र, याकडे ग्रामपंचायत गांभिर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागत आहेत. अगोदरच उकाड्याने हैराण केले असून उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वर सरकत आहे. सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कारभारामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप होत असून ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दहा पैकी केवळ एकच हातपंप सूरू-

वसाली येथे १० हात पंप बसविण्यात आले आहेत. यापैकी ९ हातपंप बंद असून केवळ एकच हातपंप सूरू असल्याने येथील ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने एकच हातपंप सूरू असल्याची माहिती ग्रामसेवकाने दिली आहे.

कुपनलिकेतील नादुरुस्त मोटर पंप बाहेर काढून दुरूस्ती करण्यात आले. दुरुस्त पंपाला पुन्हा कुपनलिकेत सोडण्यात आले असून गावातील पाणी पुरवठा नेहमी प्रमाणे सुरळीत करण्यात आला आहे.- बी. पी. धोंडगे, ग्रामसेवक, वसाली ता. संग्रामपूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई