शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

सिंदखेडराजा तालुक्यात विहिरींनी तळ गाठला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 19:20 IST

साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसाखरखेर्डासह अनेक गावात पाणी टंचाई पाईप लाईनसाठी पाणी पुरवठा मंत्र्यांकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : साखरखेर्डासह परिसरात यावर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण राहिल्याने तलाव कोरडेच असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे जवळपास १५ गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. विहिर अधिग्रहणासह टँकरचे प्रस्ताव ग्राम पंचायतीनी सादर केले असून यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.  कोराडी प्रकल्प ते गावापर्यंत नविन पाईप टाकावे, यासाठी ग्राम पंचायतीने पाणी पुरवठामंत्री ना.बबनराव लोणीकर यांना आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. साखरखेर्डा येथे महालक्ष्मी तलावावरुन पाणी पुरवठा केल्या जातो. त्याच प्रमाणे कोराडी प्रकल्पावरुन सुध्दा पाणी पुरवठा होतो. यावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने महालक्ष्मी तलावात जेमतेम २५ टक्के पाणीसाठा जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात तलावात मृत साठ्यापेक्षा कमी पाणी असल्याने गावाला पाणी पुरवठा करणे कठीण झाले आहे. कोराडी प्रकल्पावरुन पाणी पुरवठा करण्यासाठी ग्राम पंचायतीसाठी किरकोळ दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु पाईप लाईन ही निकृष्ट दर्जाची असल्याने गावापर्यंत पाणी पोहचण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागणार आहे. कोराडी प्रकल्प ते गावापर्यंत नविन पाईप टाकावे, यासाठी ग्राम पंचायतीने पाणी पुरवठामंत्री ना.बबनराव लोणीकर यांना आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मार्फत प्रस्ताव सादर केला आहे. पिंपळगांव सोनारा येथेही यावर्षी भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील नळयोजनेला किमान ४० वर्ष पूर्ण झाले असून पाणी पुरवठा विहिरीत पाणी नाही जवळपास एकही तलाव नाही. त्यामुळे या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा, असा प्रस्ताव सरपंच तोताराम ठोसरे यांनी तहसिलदार आणि पंचायत समितीकडे पाठविला आहे. त्याच बरोबर गावात नविन नळयोजना प्रस्तावित करुन पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी प्रस्ताव आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांचेकडे सादर केला आहे. या गावात आहे पाणी समस्यासिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव, शिंदी, राताळी, उमनगाव, दरेगाव, मोहाडी, तांदुळवाडी, काटेपांग्री, सावंगीभगत या गावातही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही गावात टँकरची मागणी करण्यात आली असून विहिर अधिग्रहणाचे प्रस्तावही पाठविले आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा