शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एका वर्षाची रक्कम अग्रिम देण्यास सरपंचांची नकारघंटा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:31 IST

ऑनलाइन सेवा तत्काळ व अचूक मिळाव्यात, याकरिता सुरू  झालेल्या आपली सरकार सेवा केंद्रामधून अपेक्षित सेवा मिळत नसल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी नाराज असतानाच आता जिल्हा परिषदेच्या सामान्य  प्रशासन विभागाने सर्व ग्रामपंचायतींना तब्बल वर्षभराचे पैसे अग्रिम मागितल्याने गावचे सरपंच नाराज झाल्याचे दिसून येते. 

ठळक मुद्देआपले सरकार सेवा केंद्राचा तिढा वाढला जिल्हा परिषदेच्या पत्रावरून नाराजी 

संदीप गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : ग्रामपंचायतींच्या संगणकीकरणाच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत ई- गर्व्हनन्सद्वारे जोडून ग्रामस्थांना ऑनलाइन पद्धतीने विविध दाखले मिळावेत,  याशिवाय इतरही ऑनलाइन सेवा तत्काळ व अचूक मिळाव्यात, याकरिता सुरू  झालेल्या आपली सरकार सेवा केंद्रामधून अपेक्षित सेवा मिळत नसल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी नाराज असतानाच आता जिल्हा परिषदेच्या सामान्य  प्रशासन विभागाने सर्व ग्रामपंचायतींना तब्बल वर्षभराचे पैसे अग्रिम मागितल्याने  गावचे सरपंच नाराज झाल्याचे दिसून येते. 

संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र संग्राम हा कार्यक्रम आटोपल्यानंतर शासनाने ग्रा. पं.च्या नोंदवल्याचे संगणकीकरण करणे, विविध दाखले ऑनलाइन देणे, शे तकर्‍यांचे विविध योजनांचे फॉर्म गावातूनच ऑनलाइन भरणे, रेल्वे बुकिंग,  इले. बिल भरणे व अशा आणखी बर्‍याच सेवा जलद व ऑनलाइन पद्धतीने  गावातच मिळण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना ग्रा.पं. स्तरावर  केली. या केंद्राच्या सेवेच्या मोबदल्यात प्रत्येक ग्रामपंचायतने महिन्याकाठी  १२३३१ रु. जिल्हा परिषद प्रशासनाकडे जमा करावयाचे आहेत. यापूर्वी  दरमहा रक्कम जमा करावी लागायची; परंतु आता मात्र प्रशासनाने १ जुलै  २0१७ पासून ते ३0 जून २0१८ पर्यंतच्या तब्बल एका वर्षाची प्रतिमाह  १२३३१ रु. प्रमाणे बारा महिन्यांचे १ लाख ४७ हजार ९७२ रु. एवढी रक्कम  ग्रा.पं.ना अग्रिम भरावयास सांगितले आहे. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन  विभागाने जिल्ह्यात सर्व पं.स. यांना पत्र पाठवून २९ व ३0 नोव्हेंबर रोजी सर्व  ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांचे पं.स. स्तरावर कॅम्प आयोजित करून या अग्रिम  रकमेचे धनादेश गोळा करण्याचे कळविले असून, तत्काळ सदर गोळा झालेले  धनादेश जि.प. प्रशासनास पोहोचविण्याचे सांगितले आहे.त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र केवळ गावाच्या विकासाचा पैसा  पळविण्याचा मार्ग असल्याचे सरपंचाचे मत आहे. नांदुरा तालुक्यात ४३ स्वतंत्र  ग्रा.पं.मध्ये तर ११ दोन गावांचे मिळून असे एकूण ५४ आपले सरकार सेवा  केंद्र असून, १२३३१ रु. प्रतिमाह प्रमाणे १,४७,९७२ रु. वर्षाचे असे ५४  केंद्रांचे तब्बल ७९,९0,४८८ रु. विनाकारण कोणतीही सेवा न मिळताच द्यावे  लागणार आहेत. 

आपले सरकार सेवा केंद्रामधून कोणत्याही सेवा मिळत नसून, कित्येक ग्रा. पं.ची संगणक यंत्रणा, प्रिंटरही सुरू नाहीत. त्यामुळे गावाच्या विकासाचा निधी  असा व्यर्थ करण्याची आमची तयारी नाही. तालुक्यातील ग्रा.पं.मधून तब्बल  ऐंशी लाख रुपये आता मागितले असून, सेवा मिळेपर्यंत ही रक्कम देण्यास  आम्ही तयार नाही.- अमोल चोपडे,अध्यक्ष, सरपंच संघटना, नांदुरा.

केंद्रामधून मिळणार्‍या सेवांचे व ऑपरेटरच्या कामाचे टास्क इन्फर्मेशन  ग्रामसेवकच करतात. मिळालेल्या सेवांचे व कामांचेच देयके प्रशासन अदा  करेल. ग्रा.पं.कडून एका वर्षाचे अग्रिम घेतले असले, तरी सदर पैसा काम  झाल्यावरच खर्च होणार आहे. त्यामुळे सरपंच व ग्रामसेवक यांनी पुढाकार  घेऊन कामे करून घ्यावीत.- एस.ए. चोपडे,डेप्युटी सीईओ, जि.प. बुलडाणा.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे