शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

सैनिकांना रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच !

By admin | Published: August 26, 2015 12:34 AM

वन रँक वन पेन्शन; सैनिकांचा सन्मान ठेवण्यासाठी ही मागणी मान्यच व्हावी.

बुलडाणा : सैनिकांचे काम देशसेवा आहे. जोपर्यंंत तो सैन्यात असतो तोपर्यंंत त्याच्या घरादाराचा विचारही त्याच्या मनात शिवत नाही. आयुष्यातील उमेदीची वर्ष तो सैन्यात घालवितो व ज्यावेळी सैन्यातून नवृत्त होतो त्यावेळी त्याचे मुलेही कमावती झालेली नसतात. अशा वेळी त्याला मिळणारी पेन्शन हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे; मात्र वाढती महागाई व तो देत असलेली सेवा याचा ताळमेळ पेन्शनमध्ये बसत नाही. आधी नवृत्त झालेल्या सैनिकांवर पेन्शनच्या बाबतीत खूप मोठा अन्याय झाला असल्याने वन रँक वन पेन्शन हाच एकमेव मार्ग आहे. जे सैनिक देशासाठी बलिदानास तयार होतात त्याच सैनिकांना पेन्शनसाठी रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली. लोकमत जिल्हा कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत या संदर्भात अतिशय भावनिक मुद्दे उपस्थित करण्यात आले. चर्चेची सुरुवात करताना सुभेदार मेजर के.डी.जाधव यांनी तीन युद्धात सहभाग घेतलेला एक सैनिक सध्या मोळय़ा विकण्याचे काम करतो, ही व्यथा सांगितली. तो सैनिक नवृत्त झाल्यानंतर त्याला मिळणारी पेन्शन व आज नवृत्त झालेल्या त्याच्याच दर्जाच्या सैनिकाला मिळणारी पेन्शन यामध्ये खूप अंतर असल्याने एकाला मोळय़ा विकाव्या लागतात, हे स्पष्ट करून वन रँक वन पेन्शनचा मुद्दा प्रकर्षाने पटवून दिला. कप्टन अशोक राऊत यांनी विविध देशातील सैनिकांच्या पेन्शनचे त्यांना मिळणार्‍या सन्मान व नवृत्तीनंतरच्या सुख-सोयीची उदाहरणे देत वन रँक वन पेन्शनचे महत्त्व स्पष्ट केले. एखादा सैनिक शवपेटीत आला तर त्याच्या सन्मानासाठी सर्व गाव गोळा होते. सर्व अधिकारी, नेते मानवंदना देण्यासाठी येतात; पण तोच सैनिक दररोज जीवनाशी संघर्ष करीत मरणयातना सोसतो त्याच्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे. ते होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली. सेवानवृत्त हवालदार विनायक माधवराव अनाळकर यांनी सुभेदार मोतीराम चिंचोले यांनीही विविध प्रसंग सांगून पेन्शनर सैनिकांच्या व्यथा विषद केल्या. सैनिकीसेवेतून नवृत्त झाल्यानंतर सैनिकांना मिळणार्‍या नोकर्‍या या गार्ड सदृश सेवेच्याच असतात. त्यांचा कोणी सन्मानही ठेवत नाही. शौर्यचक्रही विजेता गार्ड झाल्यावर त्याच्याशी वागणूकही नोकराप्रमाणे असते, अशा सैनिकांचा आत्मसन्मान जपण्यासाठी वन रँक वन पेन्शन मिळाले तर सैनिकांचे जीवनमान व कुटुंबाचे राहणीमान उंचावेल, हालाखीच्या परिस्थितीत त्यांना जगावे लागणार नाही, अशी भावना व्यक्त झाली.