शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

संकटातही सावरल्या पेरण्या!

By admin | Published: August 26, 2015 12:31 AM

बुलडाणा जिल्ह्यातील २४ ऑगस्टपर्यंत ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने केली.

बुलडाणा : ऐनपेरणीच्या हंगामात पाऊस गायब झाल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. शेतकर्‍यांसाठी हे अस्मानी संकट नवीन नाही; परंतु यात सुलतानी संकटांची भर पडल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले; मात्र शेतकर्‍यांनी या सर्व गोष्टीला सामोरे जात संकटाच्या काळातही आपल्या पेरण्या पूर्ण केल्या. जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोजून चार-पाच दिवसात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवातीपासूनच दुष्काळाचे ग्रहण लागले होते. पावसाच्या आशेवर बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणीची कामे सुरु केली आहेत; मात्र पुढे पावसाने दडी मारल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला. पाण्याअभावी उभी पिकेही वाळून गेली. या आस्मानी संकटाबरोबरच शेतकर्‍यांपुढे सुलतानी संकटेही उभी राहिली. यंदा विविध बँकांनी थकीत कर्जदार शेतकर्‍यांना ऐनपेरणीच्या काळात कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे शेतकर्‍यांपुढे आर्थिक संकट उभे राहणे, जिल्हा प्रशासनाने कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय वेळेवर घेतला असता, तर शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळाला असता. यामुळे जिल्ह्यात पेरण्या लांबल्या. ३0 जूनपयर्ंत जिल्ह्यात केवळ २८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पावसाची अवकृपा आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरामुळे बळीराज्याचे मनोधैर्य खचल्यामुळे गत चार महिन्यात जिल्ह्यातील ११ शेतकर्‍यांनी आत्महत्याचा मार्ग स्वीकाराला; मात्र या पाचवीला पुजलेल्या संकटावरही मात करून आजपर्यंंत ७ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रावर ९५ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहे.