शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:34 AM

देऊळगावमही : आघाडी सरकारने अर्थ संकल्पीय अधिवेशनात थकीत वीजबिलधरकांची वीज खंडित न करण्याची घोषणा केली होती. मात्र ...

देऊळगावमही : आघाडी सरकारने अर्थ संकल्पीय अधिवेशनात थकीत वीजबिलधरकांची वीज खंडित न करण्याची घोषणा केली होती. मात्र अचानक यू-टर्न घेत वीज खंडित न करण्याचा निर्णय मागे घेत शेतकऱ्यांच्या शेतातील कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून, अनेक शेतकऱ्यांची उभे पिके वाळत आहे. महावितरणने कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवावे, अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

देउळगाव राजा तालुक्यात सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग, मका, ऊस, पपई, टरबूज, अद्रक, भाजीपाला आशा पिकांची लागवड केली आहे. दिवसेंदिवस ऊन तापत असून, दर तिसऱ्या दिवशी या पिकांना पाणी द्यावे लागत आहे.मात्र वीजबिल थकबाकीच्या नावाखाली महावितरणाने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित करण्यास सुरुवात केली आहे. अंदाजित अव्वाच्या-सव्वा रकमा बिलावर टाकून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे.अर्थ संकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी थकीत वीजबिलधारकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची घोषणा केली. मात्र, दोन दिवसांतच वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याने पाण्याअभावी शेतातील पिके सुकत आहेत. कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करणे तात्काळ थांबवा, अन्यथा महावितरणाच्या या तुघलकी कारभारा विरोधात शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसंग्राम संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत पठाण, विनायक अनपट, संतोष हिवाळे, चंद्रभान झिने आदींनी दिला आहे.