शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
5
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
6
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
7
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
11
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
12
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
13
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
14
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
16
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
17
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
18
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
19
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
20
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?

निंबोळी अर्काला ‘सबसीडी’चे कवच देण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 5:30 PM

वनस्पतीजन्य किटकनाशकाचे महत्त्व ओळखून, आता निंबोळीअर्क फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० टक्के सबसीडी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कीड व्यवस्थापनावर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. कृषी विभागाकडून शेतकºयांना निंबोळी अर्काच्या खरेदीवरच ५० टक्के सबसीडी देण्यात येणार आहे. सबसीडी संदर्भात कृषी विभागाने कृषी आयुक्तालयांकडेही प्रस्ताव पाठविला आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : राज्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षात वाढले आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून नवनवीन फंडे बोंडअळी नियंत्रणासाठी वापरण्यात येत आहेत. त्या पृष्ठभूमीवर वनस्पतीजन्य किटकनाशकाचे महत्त्व ओळखून, आता निंबोळीअर्क फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० टक्के सबसीडी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कृषी आयुक्तालयांकडे यासाठी एक प्रस्तावच पाठविण्यात आला.राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केल्या जाते. त्यामध्ये बुलडाणा, अकोला, नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, जळगाव, जालना, अहमदनगर, नांदेड, वर्धा यवतमाळ, बीड या जिल्ह्यात कपाशीचे उत्पादन सर्वाधिक आहे. परंतू गेल्या दोन वर्षापासून कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसानाचा फटका शेतकºयांना बसत आहे. त्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कीड व्यवस्थापनावर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. गेल्यावर्षी कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावाची धास्ती कृषी विभागाने घेतली आहे. बोंडअळीच्या या भितीने यावर्षी कपाशीचे बियाणे २५ मे नंतरच बाजारात आणले, कापुस पेरा ५ जूननंतर सुरू केला. मे २०१८ पासून बुलडाणा जिल्ह्यात ३२ जिनिंग मिलमध्ये २८७ फेरोमन ट्रॅप लावण्यात आले. यामधील ल्युअर जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात बदलण्यात आले आहे. तर १० जुलैपासून त्यामधील पतंगाच्या संख्याबाबत निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळी साधारणत: पेरणीनंतर ९० दिवसानंतर येते. परंतू सद्यस्थितीत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनीसुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे वनस्पतीजन्य किटकनाशक असलेल्या निंबोळी अर्काचा शेतकºयांनी जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी कृषी विभागाकडून शेतकºयांना निंबोळी अर्काच्या खरेदीवरच ५० टक्के सबसीडी देण्यात येणार आहे. सबसीडी संदर्भात कृषी विभागाने कृषी आयुक्तालयांकडेही प्रस्ताव पाठविला आहे.निंबोळी अर्काच्या फवारणीसाठी जागृतीकीड येताच शेतकरी महागडे औषधांकडे धाव घेतात. मात्र वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करत नाहीत. त्यामुळे कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून निंबोळी अर्काचे महत्व पटवून देण्यात येत आहे. सद्यस्थितीत कपाशी किपाची फुलकळी सुटण्याची अवस्था आहे. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सर्व कृषी गटामार्फत पहिले निम अर्काची फवारणी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत १ हजार ४१३ शेतकºयांच्या सभा घेण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती