शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सुजलाम् सुफलाम्’चे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम- शांतीलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 13:36 IST

दोन वर्षात प्रकल्पातंर्गत झालेले काम व पुढील काळात करावयाच्या कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोणातून बैठक घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत जवळपास एक हजार २५५ ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली असून त्यातंर्गत निघालेल्या गाळामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक बनण्यास मदत झाली असून या प्रकल्पाचे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचे मत बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात २६ फेब्रुवारी रोजी गेल्या दोन वर्षात प्रकल्पातंर्गत झालेले काम व पुढील काळात करावयाच्या कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोणातून बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केली. या बैठकीस जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, शांतीलाल मुथ्था, बीजेएसचे जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी राजाराम पुरी, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते.सुमन चंद्रा रुजू झाल्यानंतरची ही पहिलीच सुजलाम सुफलामची बैठक होती. त्यानुषंगाने राजेश देशलहरा यांनी त्यांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा प्रशासन आणि बीजेएसच्या वतीने मार्च २०१८ पासून जेसीबी, पोकलेन असा १६८ मशीनन्सच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे १३ ही तालुक्यात करण्यात आली. जिल्ह्यात प्रथमच झालेल्या अशा व्यापक कामामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होऊन जमिनीची सुपीकता वाढली आणि शेतकरी सुखावल्याचे चित्र असल्याचे मत शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले. यामुळे गारमीण भागातील अर्थकारणालाही चालना मिळाली असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.जिल्हाधिकारी सुमन चंद्राही यांनी उपक्रमाचा सविस्तर आढावा घेऊन कामाबाबत समाधान व्यक्त केले. सोबतच शासनाच्या निर्देशानुसार लवकरच आगामी काळातील कामाची दिशा ठरविण्यात येईल, असे स्पष्ट केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन