शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

प्रकल्प बाधितांचा १५ जूनपर्यंत सर्व्हे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:26 AM

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ...

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे. पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा

-------------डबलबातमी--------------------------------------------------------------------------------

मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पाच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे २०१२ पासून तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यांना तत्काळ सर्व्हे करून मदत देण्यासाठी अहवाल १५ जूनपर्यंत पूर्ण न केल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ जून पासून पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे.

मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे.