शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली दगडाची धूळपेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:26 AM

गतवर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले हाेते़ त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल ...

गतवर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लागू केले हाेते़ त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा माल कवडीमोल भावात विकावा लागला़ त्यानंतर कशीतरी खरिपाची पेरणी केली़ दरम्यान, सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली़ बियाण्यांच्या नुकसानभरपाईपोटी काही लोकांना मदत मिळाली; तर ज्या शेतकऱ्यांनी खासगी बियाणे विकत घेतले होते, त्यांना ती मिळाली नाही़ मूग, उडीद तोडणीवेळी संततधार पाऊस झाल्याने तोडणी पूर्ण खराब झाली; तसेच सोयाबीन हंगामात पावसामुळे सोयाबीनच्या झाडांवरच शेंगांना कोंब आले होते़ त्यामुळे त्या पिकाचीसुद्धा नासाडी झाली़ त्याचा परिणाम कपाशीवरसुद्धा झाला़ शेतीला लागलेला खर्च वसूल झाला नसल्याने गतवर्षी बँकेकडून काढलेले कर्ज भरू शकले नसल्यामुळे त्या कर्जाचे पुर्नगठण करून परत शेतकऱ्यांना वाटप करून द्यावे. विविध समस्यांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे़ आता पेरणीचे दिवस तोंडावर आले असल्याने पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी असून शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरातील भूमराळा दरी येथे चक्क दगडाची पेरणी करून शासनाच्या निषेध व्यक्त केला़ यावेळी लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल मोरे, सचिव अनिल लांडगे व शेतकरी उपस्थित होते़

पीकविम्यापासून शेतकरी वंचित

अतिवृष्टीमुळे जवळपास सर्व पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने काही भागांतील शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत दिली तर काही भागांतील शेतकऱ्यांना अद्यापही आर्थिक मदत म्हणून काहीच मिळाले नाही़ निसर्गाच्या प्रकोपाने पिकाची नुकसान झाल्यास भरपाई मिळविण्याकरिता पंतप्रधान पीक विमा योजनाअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली़; परंतु नुकसानभरपाईचे ऑनलाइन कारण दाखवून अद्यापही शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही; तसेच कित्येक शेतकरी पंतप्रधान सन्मान योजनेपासून वंचित आहेत.