शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

प्राथमिक शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:13 IST

संग्रामपूर पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. 

वरवटबकाल :  शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा संग्रामपूरच्या वतीने संग्रामपूर पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, सहावा वेतन आयोग थकबाकी मिळणे बाबत, वेतन तफावत, भविष्य निर्वाह निधी, डी.सी.पी.एस. धारकांचा सहावा वेतन आयोग हप्ता जमा करण्यासंदर्भात शिक्षक संघटनेने नेहमी पाठपुरावा केला. याच अनुषंगाने संग्रामपूर  गटशिक्षणाधिकारी यांना  तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रकारच्या समस्या निवारण सभा घेण्यात आली. शिक्षकांच्या समस्या मांडुन २० जुलै २०१९ रोजी समस्या निवारण सभेत शिक्षकांचे विविध प्रश्न व समस्या  गटशिक्षणाधिकारी यांच्या समक्ष मांडण्यात आल्या होत्या. वेळोवेळी पाठपुरावा पण केला परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून अद्यापही काही महत्वाच्या समस्या सोडवण्याबाबत तत्परता दिसली नाही, त्यानंतर अनेक समस्या वाढतच गेल्या. वैयक्तिक शिक्षकांचे अनेक प्रश्न व समस्या ह्या तशाच पेडींग राहत असल्याने त्यानुसार अ.भा.शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष दि.रा.भालतडक, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राज्य चिटणीस गौतमराव मारोडे यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात शिक्षकांच्या सर्व पेडींग समस्या मांडण्यात आल्या होत्या.  १९ नोव्हेंबररोजी लाक्षणिक उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या मागण्याची पूर्तता झाली नसल्याने पंचायत समिती समोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका संग्रामपूर च्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. यामध्ये राज्य चिटणीस गौतमराव मारोडे, तालुकाध्यक्ष शाम कौलकार, शिक्षक पतसंस्था अध्यक्ष भास्कर डोसे, शिक्षक अनिल धनभर, मिलिंद सोनोने, देविदास बावस्कर, सुधीर दाते, संतोषराव मोरखडे, प्रेमलाल जावरकर ,वसंत खंडारे,उमाशंकर रंगभाल ,सौ मंदा टाले,आशा रौदळे, तुळशीराम काळपांडे,शंकर बाजोड,श्रीहरी सोळंके,भास्कर डोसे, मनोहर खंडेराव,संतोष शेडके,मुकुंद भटकर यांच्यासह आदी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सह शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत लाक्षणिक उपोषण सोडणार नाही अशी भूमिका म.रा.प्राथमिक शिक्षक संघ संग्रामपूर शाखेने घेतली असल्याचे राज्य चिटणीस गौतमराव मारोडे यांनी सांगितले.