शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

संचमान्यतेत अडकली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती, १५ मे पर्यंत अंतिम संचमान्यता करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन

By संदीप वानखेडे | Published: May 07, 2023 5:05 PM

आता शिक्षण विभागाने १५ मे पर्यंत शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे नियाेजन केले आहे.

बुलढाणा : राज्यभरात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली़. त्याचा निकालही जाहीर करण्यात आला. मात्र, संचमान्यताच झाली नसल्याचे ही भरती रखडल्याचे चित्र आहे. आता शिक्षण विभागाने १५ मे पर्यंत शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे नियाेजन केले आहे.

गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नसल्याने जिल्हा परिषदांसह खासगी शाळांमध्ये माेठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. दुसरीकडे डीएड, बीएड झालेले लाखाे भावी शिक्षक बेराेजगार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर राज्य शासनाने शिक्षक भरती प्रक्रियेला गती दिली आहे. शाळांमधील बाेगस विद्यार्थी शाेधण्यासाठी आधार वैध संख्येवर संच मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया शाळांमध्ये सुरू आहे. सद्यस्थितीत आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शाळांची आधार वैधतेची कार्यवाही पूर्ण झालेली नाही, अशा शाळांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता १५ मे २०२३ पर्यंत अंतिम करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन आहे.

जुलैपर्यंत पाेर्टलवर येणार रिक्त पदांची माहितीसंच मान्यता अंतिम करून संच मान्यतेचे शाळानिहाय वितरण २० मे २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदू नामावली ३० जून २०२३ पर्यंत प्रमाणीत करण्यात येणार आहे. त्यानंतर पहिल्या तिमाहीकरिता १५ जुलैपर्यंत शिक्षकांच्या रिक्त पदे पाेर्टलवर येणार आहेत. 

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थीbuldhanaबुलडाणा