शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

विहिरीच्या नावावर शेतकऱ्यांकडून दहा हजार रुपयाची वसूली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:26 AM

काही लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांकडून दहा हजार रुपये जमा करणे सुरु केले आहे.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: रोजगार हमी योजनेची कामे सध्या बंद आहेत. असे असतानाही ‘मागेल त्याला सिंचन विहिर’ या योजनेअंतर्गत विहिर अनुदानासाठी अर्ज भरून घेण्याचे प्रकार काही ठिकाणी सुरु आहेत. विशेष म्हणजे काही लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांकडून दहा हजार रुपये जमा करणे सुरु केले आहे. विहिर वाटपाच्या नावाखाली शेतकºयांच्या होत असलेल्या फसवणूकीकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होतांना दिसत आहे.शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकºयासाठी शाश्वत व तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘सिंचन विहिर कार्यक्रम’ राबविण्यात येतो. रोजगार हमी योजनेतून दुष्काळी भागात प्रामुख्याने शेतकºयांना विहिर, शेततळे बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. फेब्रुवारी अखेरपर्यंत ही योजना सुरु होती. मात्र मार्च महिन्यात कोणत्याही प्रकारचे अर्ज पंचायत समिती स्तरावर मागविण्यात आले नाहीत. तरीसुद्धा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर या तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींकडून व दलालांकडून शेतकºयांना रोजगार हमी योजनेतून विहीर मिळवून देतो अशी बतावणी करून दहा हजार रुपये गोळा केले जात आहेत. विशेष म्हणजे त्याच्याकडून अर्जही भरून घेतला जात आहे. प्रत्यक्षात सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अशी कोणतीही योजना राबविल्या जात नसल्याचे सुत्रांनी सांगितले.अशी आहे पात्रता* संबधित शेतक-याकडे त्याच्या नावावर कमीतकमी ०.६० हेक्टर जमीन असावी. यात कमाल मयार्दा नाही.* लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. (यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात यावा.)* अर्जदाराने विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. 

शासनाच्या वतीने सिंचन विहिरीसंदर्भात अद्याप कोणतीही योजना राबविण्याचे नियोजन नाही. गत तिन महिन्यात एकही अर्ज पंचायत समितीकडे प्राप्त झाला नाही. रोजगार हमी योजनेचे काम जरी जिल्हास्तरावरून होत असले तरी अर्ज पंचायत समितीकडे जमा केले जातात. शेतकºयांनी विहिरीच्या लाभासाठी कुणालाही पैसे देवू नये. असा काही प्रकार निर्दशनास आल्यास थेट तक्रार करावी.-डॉ. एस.टी.चव्हाण, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नांदुरा 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना