शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

महामार्ग चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी मे २0१९ पर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:23 IST

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटीएनएलची उपकंपनी असलेल्या अमरावती  चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडदरम्यान ८ सप्टेंबर २0१५ रोजी करार करण्यात आला. त्यानुसार  कंत्राटदार कंपनीस मे २0१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे.

ठळक मुद्देमुदतीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारणी..

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटीएनएलची उपकंपनी असलेल्या अमरावती-चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडदरम्यान ८ सप्टेंबर २0१५ रोजी करार करण्यात आला. त्यानुसार  कंत्राटदार कंपनीस मे २0१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे. याचा अर्थ काम  पूर्ण करण्यासाठी आता कंपनीकडे  दीड वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे; मात्र मोठय़ा  पुलांच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नसल्याने काम मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता अत्यल्प  दिसत आहे.अमरावती-चिखली मार्गावर एकूण १४ मोठे पूल, चार रेल्वे ओव्हरब्रिज आणि अनेक छोटे  पूल असतील. चौपदरीकरण करताना, अनेक जुन्या पुलांच्या लगत नवे पूल उभारावे लागणार  आहेत, तर काही जुन्या पुलांचे रुंदीकरण व दुरुस्ती करावी लागणार आहे; मात्र अजूनही या  मार्गावरील मोठय़ा पुलांच्या  व रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला सुरुवात झालेली नाही.   करारानुसार प्रकल्प पूर्ण करण्याच्या मुदतीदरम्यान तीन ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ निर्धारित करण्यात  आले आहेत. त्यापैकी दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ कंत्राटदार कंपनीच्या नियुक्तीनंतर ४00 व्या  दिवशी पूर्ण होईल, असा उल्लेख करारात आहे. कंत्राटदार कंपनीच्या नियुक्तीची तारीख ९  नोव्हेंबर २0१६ ही आहे. त्यानुसार दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ १४ डिसेंबर २0१७ रोजी पूर्ण  झाला. करारानुसार, दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदार कंपनीने सर्व पुलांच्या  कामांना प्रारंभ करणे आणि एकूण प्रकल्प किमतीच्या किमान ३५ टक्के रक्कम खर्च केलेली  असणे अभिप्रेत आहे. कंत्राटदार कंपनीने मोठय़ा पुलांच्या कामांना अद्याप प्रारंभ केलेला  नसल्यामुळे, करारातील या शर्तीचा भंग झाल्याचे स्पष्ट होते.

मुदतीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारणी..

  • अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेड  कंपनीची नियुक्ती ९ नोव्हेंबर २0१६ रोजी झाली.  करारानुसार त्या तारखेपासून ९१0 दिवसांच्या कालावधीत काम पूर्ण होणे गरजेचे आहे. 
  • निर्धारित मुदतीत काम पूर्ण  न झाल्यास दंडाची आकारणी करण्याची तरतूद करारनाम्यात  करण्यात आली आहे. 

 

लांबीचा निकष लांबीच्या निकषावर पुलांची निर्मिती होणार आहे. ६0 मीटर लांबीचे अंतर असल्यास त्या  ठिकाणी मोठे पूल बांधले जातील. ६0 मीटरपेक्षा कमी; पण ८ मीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर  लहान पूल बांधले जातील. ८ मीटरपेक्षा कमी अंतर असेल, तर कलव्हर्ट बांधण्यात येणार  आहेत. 

दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणाचौपदरीकरणाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आधीच नेमली गेली  आहे. त्या यंत्रणेचे अधिकारी वेळोवेळी कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना करीत  असतात. त्यामुळे कामांचा दर्जा ढासळण्याची शक्यता नसल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला  आहे.

बोरगाव मंजू, खामगाव, नांदुर्‍यात नवे बायपास विस्तार आणि लोकसंख्या जास्त असलेल्या तीन गावांच्या बाहेरून नवे वळणरस्ते बांधण्यात  येणार आहेत. त्यामध्ये  खामगाव, नांदुरा व बोरगाव मंजूचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची निर्मिती  करताना, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन,  पुलांची निर्मिती केली जाते. ऋतूनिहाय ते निर्णय घेतले जातात. वाहतुकीस अडथळा निर्माण  होऊ नये, हे महत्त्वाचे आहे. महामार्गाचे बांधकाम दीर्घकाळ चालत असते. त्यामुळे आधी पूल  बांधणे तसे सोईस्कर असते. गरज आणि टोपोग्राफीवर ते अवलंबून असते.- मुरलीधर जेठवाणी,सेवानवृत्त अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhali roadचिखली रोडAmravatiअमरावतीhighwayमहामार्ग