शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले; संपत्तीच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या!

By सदानंद सिरसाट | Updated: July 22, 2024 15:53 IST

आरोपीसह त्याच्या मित्राला अटक.

(सदानंद सिरसाट : खामगाव, जि. बुलढाणा)संग्रामपूर-वरवट बकाल : वान नदीपात्रात पाच दिवसांपूर्वी कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले आहे. संपत्तीचा हिस्सा नावावर करून देत नसल्याच्या वादातून मुलाने त्याच्या मित्रासह वडिलांची हत्या केल्याचे उघड झाल्याने जामोद येथील रहिवासी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तर, मृत अशोक विष्णू मिसाळ (५०) असून, अकोला जिल्ह्यातील, तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील रहिवासी आहे.

संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावालगत दक्षिण दिशेला वाननदी पात्रातील एका खड्ड्यात अनोळखी मृतदेह १६ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आढळून आला होता. तामगाव पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून पाचव्या दिवशी रविवारी या प्रकरणाचे रहस्य उलगडले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृत अशोक मिसाळ १३ जुलै रोजी दानापूर येथे घरात झोपेत असताना, रात्री मुलगा व त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दानापूर येथून दुचाकीने वान नदी पात्रातील एका खड्ड्यात रेती मिश्रीत दगडांनी बुजवून ठेवला. तिसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तपास करीत दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा तामगाव पोलिस ठाण्यात कलम १०३ (१), २३८ भा. न्या. संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तामगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे, विलास बोपटे, बिट जमादार अशोक वावगे, रामकिसन माळी, प्रमोद मुळे, विकास गव्हाड, संतोष मेहेंगे, संतोष आखरे यांनी केली.संपत्तीच्या हिश्शासाठी घडले हत्याकांडवडिलांकडे संपत्तीचा हिस्सा नावावर करून देण्याची मागणी नेहमी आरोपी मुलाकडून होत होती. मात्र, मृतकाने संपत्ती नावावर करून दिली नसल्याच्या कारणावरून मुलाने हा प्रकार केला. याप्रकरणी जामोद येथील आरोपी मुलगा प्रमोद उर्फ शुभम अशोक मिसाळ (२४), त्याचा मित्र राहुल रामदास दाते (२५) या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुलगा आल्यानंतर वडील गायबशनिवारी दुपारी आरोपी प्रवीण उर्फ शुभम अशोक मिसाळ हा वडिलांच्या भेटीसाठी आला होता. रात्रभर अशोक मिसाळ यांच्यासोबत होता. दुसऱ्या दिवशी कोणालाही काही न सांगता परस्पर जामोद येथे निघून गेला, तेव्हापासूनच अशोक मिसाळ हेसुद्धा गायब झाल्याची माहिती पुढे आली.

२० वर्षांपासून होते वेगळेअशोक मिसाळ हे त्यांची पत्नी व मुलापासून गेल्या २० वर्षांपासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांच्या नावावर असलेली जमीन व प्लॉट हे त्यांची पत्नी व मुलाच्या नावावर करून देत नव्हते, तसेच त्याची परस्पर विक्री करीत होते. याबाबत मुलगा प्रवीण हा दानापूर गाठून वडिलांशी वाद घालत होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी