शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 15:47 IST

खामगाव : काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितले.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील  सर्वात मोठ्या कृषी महोत्सवाचे खामगावात उदघाटन.कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकºयांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. खामगाव शहरात टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

खामगाव : गत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकºयांची तिप्पट प्रगती झाली आहे. ही प्रगती केवळ कागदावरच नव्हे, तर ती दृष्य स्वरुपात आहे. भाजपच्या सरकारने शेतकºयांसाठी काँग्रेसच्या सरकारपेक्षा तिप्पट आर्थिक तरतुद केल्यामुळे हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला. काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितले.शासकीय योजनांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात चार दिवसीय पश्चिम विदभार्तील सर्वात मोठा कृषी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवात फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खा. प्रतापराव जधाव, खा. रक्षा खडसे, आमदार आशिष शेलार, आ.संजय रायमूलकर, खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅॅड. आकाश फुंडकर, आ.डॉ संजय कुटे, शशीकांत खेडकर, जि. प. अध्यक्षा उमा तायडे, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू विलास भाले, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांचेसह आमदार, खासदार यांचेसह भाजपचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, भाजप सरकारने शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकºयांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकºयांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. आॅनलाईन कर्जमाफीमुळे सरकारवर टीका झाली असली, तरी यामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. सरकारची मदत थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मागच्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी २५० कोटी मिळाले, तर यावेळच्या कर्जमाफीत एकट्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ११०० पेक्षा अधिक रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नांदगाव पेठच्या धर्तीवर खामगावात टेक्सटाइल पार्कप्रमुख कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठच्या धर्तीवर खामगावात १०० एकर क्षेत्रावर हा पार्क होणार आहे. कापूस ते धागा व धागा ते कापड आणि कापडाची निर्यात असे याचे स्वरुप असणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकºयांचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवkhamgaonखामगावDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस