शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे ५० से.मी उघडले

By योगेश देऊळकार | Published: September 01, 2024 11:42 PM

रविवारी रात्री ११ वाजता पासून धरणातून वान नदीपात्रात २८५० क्युसेसने पाण्याचा विसर्ग:नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

योगेश देऊळकार, अझहर अली, लोकमत न्यूज नेटवर्क, संग्रामपूर:- अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सीमेवरील वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणाचे दरवाजे रविवारी रात्री ११ वाजता दरम्यान ५० सेमी ने उघडण्यात आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या जलाशय पातळीत प्रचंड वाढ होत आहे. हनुमान सागर धरणातून वान नदीपात्रात २ हजार ८५० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 

रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ४१० मी. असून धरणात ८८.११ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. या धरणावर बूलढाणा जिल्हयातील खारपाणपट्ट्यातील संग्रामपूर, जळगाव जा., शेगाव हे ३ तालुके तर अकोला जिल्हयातील तेल्हारा, अकोट तालुका व शहर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरम्यान धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वान नदीला पूर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्षेकडून नदी काठावरील गावांना  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावRainपाऊस