शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

शेततळय़ात बुडून दोन युवकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2016 2:02 AM

देऊळगाव राजा तालुक्यातील घटना; शेतक-याच्या तत्परतेमुळे तिघांचे वाचले प्राण.

देऊळगाव राजा(जि. बुलडाणा), दि. 0८- शेततळय़ात पोहताना दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील तुळजापूर शिवारात घडली. दरम्यान, वेळीच एका शेतकर्‍याने तळय़ात उडी घेऊन तिघांचे प्राण वाचविले.तालुक्यातील तुळजापूर गावातील दहा ते बारा मित्र दादाराव कोल्हे यांच्या शेतातील तळय़ात पोहण्यासाठी गेले होते. यापैकी पाच मुले शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शेतात काम करीत असताना सुनील कोल्हे नामक शे तकर्‍याला मुलांचा वाचवा, वाचवा असा आवाज आला. त्यामुळे शेतकर्‍याने प्रसंगावधान राखून तळय़ाच्या दिशेने धाव घेतली, तर त्यांना मुले पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शेततळय़ात उडी घेतली व पाण्यात बुडणार्‍या हर्षल रामचंद्र मगर, विशाल समाधान मगर, अनिकेत बाबासाहेब कांबळे, विनय राजेंद्र झिने, जयेश अरुण कांबळे या पाचही मुलांना पाण्याबाहेर काढले; मात्र हर्षल मगर (वय १७) व विशाल मगर (वय १५) या दोघा मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तुळजापूर गावात शोककळा पसरली आहे. हर्षल मगर हा सिंदखेड राजा येथे ११ वीमध्ये शिक्षण घेत होता, तर विशाल हा गावातीलच शाळेत शिक्षण घेत होता. हे दोघेही जण वडिलांना एकटेच होते. याबाबत सिंदखेड राजा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. रात्री उशिरा दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.