शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पळशी झाशीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 16:29 IST

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील २४ वर्षीय युवकाने शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

संग्रामपूर :  संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथील २४ वर्षीय युवकाने शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. आत्महत्येपुर्वी युवकाने चार पानी चिठ्ठी लिहून ठेवली. शासकीय व्यवस्थेचा आपण बळी ठरत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.पळशी शिवारातील एका  शेताच्या धु-यावरील निंबाच्या झाडाला सागर दिनकर वाघ (वय २४) या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष केशव घाटे यांनी तामगाव पोलीस स्टेशनला दिली असता ठाणेदार डी.बी. इंगळे, तहसिलदार भूषण अहिरे यांच्यासह तलाठी कोतवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मृतकाच्या खिशात चारपानी चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये सागरने शासन कुचकामी ठरले असल्याचा उल्लेख करीत ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या असल्याचे नमूद केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व निकष पुर्ण करून सुध्दा घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. एकीकडे शासनाकडून मुद्रा लोनवर बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाल्याची आकडेवारी देवून शासन स्वत: पाठ स्वत:ची थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे मुद्रा लोनसाठी बँक प्रशासन बेरोजगारांची अडवणूक करीत आहे, सागर सोबतही असेच घडले.

संग्रामपूर येथील बँक आॅफ महाराष्ट्र मधील बँक व्यवस्थापनाने सतत दोन वर्षे मुद्रा लोनसाठी सागरला बँकेचे उंबरठे झिजवायला लावले. परंतु लोन काही मिळाले नाही. या सर्व बाबींचा उल्लेख सागरने चिठठीत केला आहे. माझ्या मृत्यूनंत कुटूंबाला ५ लाख रूपयाची मदत द्यावी, तो पर्यंत माझे शव ताब्यात घेऊ नये, असेही चिठठीत नमुद असल्याने गावक-यांनी सागरचे शव ताब्यात घेण्यास नकार दिला. दुपारपर्यंत शव तहसील कार्याल्यातच होते. सागर हा उच्चशिक्षित होता त्याने एम.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. मात्र बेरोजगारी पुढे हतबल झाला. सागरच्या पश्चात आई-वडील दोन लहान भाऊ आहेत. सागरने चिठ्ठीत आई-वडील व भावांना धीर देत शेजारी व नातेवाईकांना त्यांच्याकडे लक्ष देण्याचे नमूद केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा