शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

वैशाख वणव्यात बहरतेय संजीवनी!

By admin | Published: May 14, 2017 2:27 AM

उंच टेकडीवर ५१ कडूनिंबांचे संगोपन

अनिल गवई खामगाव : वर्‍हाडातील संजीवनी म्हणून ओळखले जाणारे कडूनिंबाचे वृक्ष ऐन वैशाख वणव्यात बहरले आहेत. काळेगाव जि.बुलडाणा येथे तर ऐतिहासिक कानिफनाथ गडावर चक्क १00 फूट उंचीवर कडूनिंबाची नव्याने लावलेली ५१ झाडे बहरलेली दिसत आहेत. वर्‍हाडात सर्वदूर दिसणारी कडूनिंबाची झाडे या भागाचे वैशिष्ट्य असून, ती वर्‍हाडाची ओळख बनली आहेत. कडूनिंबाच्या औषध गुणांमुळे त्यांना वर्‍हाडातील संजीवनी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उन्हाळ्यात थंडगार छाया देणारी ही झाडे वर्षानुवर्षे जिवंत राहतात व मोठय़ा प्रमाणात विस्तार पावतात. कडूनिंबांच्या झाडांचे महत्त्व ओळखूनच खामगाव तालुक्यातील काळेगाव येथील ऐतिहासिक कानिफनाथ गडावर संस्थानच्यावतीने ५१ रोपट्यांची लागवड करण्यात आली. तब्बल १00 फूट उंचावरील टेकडीवर लावलेली ही झाडे पाणीटंचाई व उन्हाळ्याच्या काळातही पाणी देऊन जगविण्याची कसरत संस्थानने गावकर्‍यांच्या मदतीने पार पाडली. त्यामुळे आज रोजी ही झाडे ५ ते ७ फुटापर्यंंत चांगली वाढली असून, ऐन वैशाखात त्यांना फुलोरा आला आहे. त्यामुळे वर्‍हाडातील ही संजीवनी येथे उत्तमरीत्या बहरलेली दिसते. याकरिता संस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव गायगोळ यांच्यासह विश्‍वस्त एकनाथ बोचरे, सुनील जोहरी, रामेश्‍वर रहाणे, दिलीप चव्हाण, रामभाऊ बगाडे, सुभाष अंबलकार, विलास इंगळे, जगन्नाथ बोचरे, वासुदेव मालठाणे, अनंता बोचरे, रामेश्‍वर कचवे, समाधान मांगटे, संजय दिवनाले, राजेंद्र बोचरे, नीलेश इंगळे, सोपान रहाणे आदींनी परिश्रम घेतले आहेत. विशेष म्हणजे त्रिशुलाच्या आकारातील टेकडीवर वसलेल्या कानिफनाथ गडावर दुर्मीळ अजाण वृक्षांचीसुद्धा पाच झाडे असून, कानिफनाथांच्या दर्शनासाठी येणारे भाविक त्यांचेही दर्शन घेत असतात.