शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

vidhan sabha 2019 : कोणाला बसणार हादरे; राजकीय गणितांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:26 IST

युतीचा गुंता न सुटल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा वृद्धींगत झालेल्या अनेक इच्छुकांची चलबिचल सुरू आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदारांनी प्रस्थापितांना नाकारत सात मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्या पृष्ठभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाला ‘हादरे’ बसतात तर कोणाला पुन्हा ‘संधी’ मिळते याबाबत सध्या राजकीय वर्तुळात गणिते मांडली जात आहेत. त्यातच युतीमधील वाढता गुंता पाहता जागा वाटपाच्या निर्णायक क्षण येण्यास अद्यापही दोन ते तीन दिवसांचा अवकाश आहे. त्यामुळे काही इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.सध्या भाजप, शिवसेना या पक्षांची चांगलीच चलती असल्याने या दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील सात विधानसभांसाठी भाजपने घेतलेल्या मुलाखतीसाठी तब्बल ६४ जणांनी हजेरी लावली होती. एकट्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून नऊ जण इच्छूक होते तर सिंदखेड राजा व चिखलीतूनही अनेक जण इच्छूक होते. शिवसेनेचा विचार करता एकट्या बुलडाण्यासाठी तब्बल ३२ जणांनी मुंबईतील शिवसेना भवनाची पायरी चढून मुलाखतीची तयारी पूर्ण केली होती. अगदी चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या काही इच्छुकांनही बुलडाण्यासाठी मुलाखती दिल्या होत्या. मात्र अद्याप युतीचा गुंता न सुटल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा वृद्धींगत झालेल्या अनेक इच्छुकांची चलबिचल सुरू आहे.भाजपच्या दृष्टीने खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोदमधील उमेदवार निश्चत असून गेल्या पाच वर्षाच्या काळात विद्यमान आमदारांनी आपला प्रभाव कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीमध्ये खामगाव आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवाराला मिळालेले ३३ हजार २७९ आणि ३६ हजार ९८४ मताधिक्य हे जमेची बाजू ठरणारे आहे.दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विजयराज शिंदे, काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा, ध्रृपदराव सावळे, रेखाताई खेडकर यांना पराभवाचे हादरे बसले होते तर खामगावात अ‍ॅड. आकाश फुंडकर, बुलडाण्यात हर्षवर्धन सपकाळ आणि सिंदखेड राजामध्ये डॉ. शशिकांत खेडेकर या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली होती.ही स्थिती पहता १४ व्या विधानसभा निवडणुकीत कोणाला हादरे बसतात आणि कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे. काहीजण ‘वंचीत’च्या उंबरठ्यावर असल्याचीही जिल्ह्यात चर्चा आहे.

यंदा निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार१४ व्या विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. अनेकांच्या महत्त्वाकांक्षा उंचावलेल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर १४ वी विधानसभा जिल्ह्यात काही नवी समिकरणे निर्माण करते की काय? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यातच १२ व्या विधानसभा निवडणुकीत बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर २०१४ च्या निवडणुकीत १०१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ८१ जणांची अनामत रक्कम जप्त झाली होती. २०१९ ची निवडणूकही विविध कारणांनी अभूतपूर्व ठरणार आहे. त्यामुळे १४ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात कोणती समिकरणे उदयास येतात याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठणी आहे. मात्र निवडणुक रिंगणातील उमेदवारांचे यंदा पुन्हा शतक गाठल्या जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019