शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खोलीकरणातून गावे पाणीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:16 IST

जळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे.

- नानासाहेब कांडलकरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे. यामुळे गावकऱ्यांच्या चेहºयावर आनंद फुलला आहे. ४८ डिग्री तापमानात केलेल्या श्रमदानाचे फलीत झाले असा कृतार्थतेचा भाव या गावांमध्ये दिसून येत आहे. येत्या काही दिवसात वरुणराजाने साथ दिली तर ज्या गावामध्ये पाणी फाऊंडेशन अंतर्गत कामे झाली ती गावे खºया अर्थाने पाणीदार होणार आहेत.जलगाव जामोद तालुक्यातील ५५ गावे तर संग्रामपूर तालुक्यातील ६० गावे यावर्षी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभागी झाली होती. त्यापैकी अनुक्रमे ३५ व ३९ गावांनीच प्रत्यक्ष काम सुरु केले. जळगाव तालुक्यात २० गावांनी चांगले काम केले तर संग्रामपूरमध्ये सक्रिय राहणारी १८ गावे होती. त्यामध्ये चांगेफळ बु., उमरा पानाचे, सावळा, भीलखेड, पिंप्री कवठळ ही ५ गावे तालुकास्तरीय स्पर्धेत पात्र ठरली. तर जळगाव तालुक्यातील बांडा पिंपळ, काजेगाव, निंभोरा बु. व निंभोरा खु. ही ४ गावे तालुकास्तरावर पात्र ठरली. यापैकी बांडा पिंपळ हे जळगाव तालुक्यातील आदिवासी गाव राज्यस्तरावरील १५ गावांमध्ये पात्र ठरले आहे.संग्रामपूर तालुक्यातील काकोडा, वानखेड, जस्तगाव, पंचाळा, वकाणा, काकणवाडा खुर्द, सालवन, सगोडा, एकलारा, सायखेड, पलसोडा, खळद बु., वरवट बकाल, नेकनामपूर, आलेवाडी, बावनबीर, अकोली, दुर्गादैत्य व धामणगाव या गावांनी पाणी फाऊंडेशनचे चांगले काम केले. जळगाव तालुक्यात पळसखेड, सुनगाव, जामोद, आसलगाव, सुलज, पळशी सुपो, हाशमपूर (वडगाव), हनवतखेड, राजुरा खुर्द, खांडवी, टाकळी खाती, पाटण (वडगाव), वडगाव पाटण या गावांनी सक्रिय राहत चांगले श्रमदान करीत व मशीनकाम करुन घेतले. जिल्हा समन्वयक प्रताप मारोडे यांच्या मार्गदर्शनात जळगाव तालुका समन्वयक ऋषिकेश ढोले, राहुल शिरसाट, वैभव गावंडे व संग्रामपूर तालुका समन्वयक विवेक वानखडे, सीमा उमाळे, गजानन ढोबाळे यांनी विशेष परिश्रम घेवून गावकऱ्यांना योग्य सूचना दिल्या. यातून गावे पाणीदार होण्यास मदत होत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट कामयावर्षी पाणी फाऊंडेशनच्या कामाच्या कालावधीत नेमकी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाली होती. त्यामुळे बहुतांश अधिकारी वर्ग या कामात व्यस्त होता. तसेच राजकीय क्षेत्रात वावरणारी नेतेमंडळी सुध्दा या निवडणुकीत कामात गुंतली असल्याने त्यांचे अपेक्षित सहकार्य पाणी फाऊंडेशनच्या कामाला मिळू शकले नाही असे असूनही गावकºयांनी मात्र आपली जिद्द कमी होवू दिली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या कामांचा गाजावाजा कमी झाला परंतु प्रत्यक्ष काम मात्र दुपटीने झाले. संग्रामपूर तालुक्यात श्रमदानाने ३५ हजार घनमीटर पेक्षा जास्त काम झाले. तर मशीनद्वारे साडेचार लाख ते पाच लाख घनमीटर काम झाले. जळगाव तालुक्यात श्रमदानाने सुमारे ९० हजार घनमीटरपेक्षा जास्त काम झाले तर मशीनद्वारे सुमारे ५ लाख घनमीटरची सीमा ओलांडली आहे.

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकSangrampurसंग्रामपूरJalyukt Shivarजलयुक्त शिवार