शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

विवेकानंद जन्मोत्सव; शोभायात्रेची ५० वर्षांची परंपरा प्रथमच खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:05 IST

Vivekananda Janmotsav: दरवर्षी काढण्यात येणाऱ्या शाेभायात्रेत ५० वर्षात प्रथमच काेरानामुळे खंड पडला आहे.

हिवरा आश्रम : स्वामी विवेकानंद जन्माेत्सवानिमित्त दरवर्षी काढण्यात येणाऱ्या शाेभायात्रेत ५० वर्षात प्रथमच काेरानामुळे खंड पडला आहे. यावर्षी काेराेनामुळे शाेभायात्रा रद्द करण्यात आली आहे.  स्वामी विवेकानंद यांची भव्य प्रतिमा व शुकदास महाराज यांची भव्य प्रतिमा आरूढ असलेल्या रथाची शोभायात्रा निघत असते.  यावर्षी कोरोनामुळे विवेकानंद जन्मोत्सवाच्या ५० व्या अभूतपूर्व शोभायात्रेत खंड पडला आहे.युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद, शुकदास महाराज यांच्या नामघोषाने विवेकानंद नगरी दुमदुमून जात असे. त्यामुळे ही शोभायात्रा सामाजिक परिवर्तनाची नांदी देणारी ठरत असे. तब्बल ५१ दिंड्या आणि बॅण्डपथके आणि लेझीम पथकांच्या जल्लोषात शोभायात्रा हरिहर तीर्थावरून सुरू होऊन जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळेत विसावत असे. जमलेल्या हजारोंच्या गर्दीत मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडून शोभायात्रेची सांगता होत असे. मल्लखांब, शारीरिक कवायती, महिला भजनी मंडळांनी धरलेला हरिनामाचा फेर, टाळ-मृदंगाचा गजर यामुळे विवेकानंद नगरी दुमदुमत असे. यानिमित्त महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने भावभक्तीला उधाण येत असे.  विवेकानंद आश्रमाच्या हरिहरतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते शुकदास महाराज व स्वामी विवेकानंदांच्या रथारूढ मूर्तीचे पूजन शंखनिनादात होत असे. मात्र यावर्षी शाेभायात्रा रद्द करण्यात आल्याने शुकशुकाट हाेता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर