शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बोंडअळी नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा; ४४ कोटी रुपयांचा निधी प्रलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 15:33 IST

 बुलडाणा : गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार हेक्टरवरील कापसाच्या नुकसानभरपाईपोटी मदत म्हणून देण्यात आलेल्या निधीचा तिसरा हप्ता अद्यापही जिल्ह्याला उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश्य स्थितीत शेतकरी त्रस्त झाला असून या निधीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झालेली आहे. त्यामुळे हा निधी त्वरित मिळावा, अशी ओरड ...

 

बुलडाणा : गेल्यावर्षी शेंदरी बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार हेक्टरवरील कापसाच्या नुकसानभरपाईपोटी मदत म्हणून देण्यात आलेल्या निधीचा तिसरा हप्ता अद्यापही जिल्ह्याला उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सध्याच्या दुष्काळसदृश्य स्थितीत शेतकरी त्रस्त झाला असून या निधीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनाही आक्रमक झालेली आहे. त्यामुळे हा निधी त्वरित मिळावा, अशी ओरड होत आहे. या निधीच्या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयात कापसाची बोंडेही फेकली होती. त्यामुळे या प्रश्नाची तीव्रता सध्या वाढत आहे. तिसर्या टप्प्यात जिल्ह्याला ४४ कोटी ७८ लाख ३६ हजार रुपयांचे अनुदान या नुकसान भरपाईपोटी मिळणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी बोंडअळीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी केंद्राच्या पथकाने जिल्ह्यात येऊन पाहणीही केली होती. त्यानंतर तसा अहवालही पाठविला होता. त्या आधारावर जिल्ह्याला १३४ कोटी ३४ लाख ३६ हजार रुपयाची नुकसान भरपाई मिळणार होती. आतापर्यंत दोन टप्प्यात ८९ कोटी ५६ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून एक लाख ३६ हजार ८६५ शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र उर्वरित शेतकर्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. तिसर्या टप्प्यात हा निधी उपलब्ध होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे हा निधी त्वरेने मिळावा, अशी ओरड शेतकर्यांमधून होत आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती पाहता शेतकर्यांना राहलेली ही नुकसान भरपाईची रक्कम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्या दृष्टीने जिल्हास्तरावरून हा निधी मिळण्यासाठी प्रभावी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती