शहरं
Join us  
Trending Stories
1
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
2
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
3
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
4
बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....
5
भारताने मालिका आधीच जिंकली; आज ३ मोठे बदल होण्याची शक्यता, अशी असेल Playing XI
6
Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट
7
PAK vs ENG : "पाकिस्तानला WTC मधून काढून टाका, गोंधळ लवकर थांबवा", दारुण पराभवानंतर अख्तर संतापला
8
कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ!
9
उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार
10
३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय?
11
देवदूत बनून आला पायलट! हायड्रोलिक खराब, ३ तास हवेतच घिरट्या, १४० जणांच्या जीवाला होता धोका; नेमकं काय घडलं?
12
Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला
13
T20 WC FINAL : मी दुखापतीचं नाटक केलं आणि खेळ मुद्दाम थांबवला; पंतने सांगितला वर्ल्ड कपमधील किस्सा
14
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
15
असा एकमेव अभिनेता ज्याने रुपेरी पडद्यावर साकारले श्रीराम, श्रीकृष्ण आणि रावण! तुम्ही ओळखलं?
16
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
17
Multibagger Stock: केवळ एका वर्षात ₹१ लाखाचे बनले ₹२० लाख; 'या' SME कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
19
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
20
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना

कर्जमाफीच्या दिशानिर्देशाची बँक अधिकाऱ्यांना प्रतीक्षा!

By admin | Published: June 15, 2017 12:46 AM

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दहा हजारांच्या मदतीबाबत संभ्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव : शासनाने कर्ज माफीची घोषणा केली असली, तरी अद्याप कर्जमाफी कुणाला व कशी द्यायची, याबाबत कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश आलेले नाहीत. सध्या पेरणीची लगबग असल्यामुळे शेतकरी बँकेत जाऊन नवीन पीक कर्जाची मागणी करीत आहेत. मात्र, बँकेचे अधिकारी दिशानिर्देशाचे कारण सांगून परत पाठवित असल्यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत. शासनाने राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना रविवारी तत्काळ कर्जमाफी जाहीर करीत सोमवारपासून नवीन पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे घोषित केले. त्यामुळे शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत असून, बँकांची मात्र नकारघंटा कायम असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात शेतकरी आंदोलनाची धग वाढत असल्याचे पाहून सरकारने रविवारी अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी जाहीर करीत दुसऱ्याच दिवशीपासून नवीन पीक कर्ज देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवू लागले आहेत. पेरणीची वेळ तोंडावर आलेली असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा त्यांच्यासाठी नवसंजीवनी देणारी ठरली. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी संबंधित बँकांमध्ये जाऊन नवीन कर्जाविषयी विचारणा करीत आहेत. प्रत्येक बँकेत शेतकऱ्यांची गर्दी दिसून येते. मात्र, कर्जमाफी व नवीन वाटपाबाबत अद्याप कोणतेही लेखी आदेश बँकांना प्राप्त झालेले नसल्याचे त्यांना सांगण्यात येत आहे. बँकांकडून शेतकऱ्यांसमोर नकारघंटा वाजविली जात असल्याने शेतकरी त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी १० हजार रुपये तत्काळ देण्याचे जाहीर केल्याने हे पैसे केव्हा मिळणार, अशी विचारणा शेतकरी बँकेकडे करीत आहेत. बँक अधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या बैठका सुरू राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असून, अद्याप कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढला नाही. दुसरीकडे शेतकरी बँकेत चकरा मारत आहेत. त्यामुळे बँक अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, कुणालाही कोणत्याही प्रकारचा आदेश नसल्यामुळे या बैठका निष्फळ ठरत आहेत. कर्जमाफीबाबत मात्र नियमित बैठका सुरू आहेत. यासोबतच शेतकऱ्यांना दहा हजारांची तत्काळ मदत मिळणार असल्याची घोषणा शासनाने केली. त्यामुळे शेतकरी बँकांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना दहा हजार रूपयांची मदत मागत आहेत. मात्र, अद्याप बँकेकडे याबाबत कोणताही अध्यादेश आला नसल्यामुळे अधिकारी पैसे देण्यास नकार देत आहेत.