शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चिंचोलीत रेशन कार्डवर मिळते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:05 IST

खामगाव : तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यामुळे शासनाकडून टँकरव्दारे पाणी वितरण करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यामुळे शासनाकडून टँकरव्दारे पाणी वितरण करण्यात येत आहे. दरम्यान पाण्यासाठी होत असलेली भांडण आणि संघर्ष पाहता पोलीस बंदोबस्तात समस्त गावकऱ्यांना आता पाणी कार्डावर पाणी वितरण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे गावातील नागरीकांना टँकरच्या पाण्याचे वितरण हे पाणी कार्डवर करण्यात येत आहे.चिंचोली परिसरातील विहिरी, बोअरवेल, नाले कोरडेठाक पडले असून पाण्याचे सर्व स्त्रोत आटले आहेत. मागीलवर्षी ऐन पावसाळ्यातही याठिकाणी पाण्यासाठीचा संघर्ष कायम होता. त्यामुळे सरपंच संजय इंगळे यांच्यासह पं.स. सदस्य, लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक संजय हाके यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयात पाणी टंचाईचा अहवाल सादर केला. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर या गावात पाण्याचे टँकर सुरू झाले.मात्र टँकरचे पाणी भरण्यासाठी होत असलेली चढाओढ आणि संघर्ष पाहता याठिकाणी पोलीस बंदोबस्तात पाण्याचे वितरण करण्यात येत होते. तरीही पाण्यासाठीचे होत असलेले भांडण काही थांबेना.सातत्याने होत असलेले भांडण तंटा टाळण्यासाठी नागरीकांना पाणी कार्डवर पाणी वाटप करण्याचा हा उपक्रम प्रभावी उपाय ठरू शकेल म्हणून सर्वानुमते पाणी कार्डवर २०० लिटर पाणी वितरणाचा निर्णय घेण्यात आला. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यावर प्रशासनाला यश आले असले तरी या गावामध्ये कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई