शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खडकपूर्णा प्रकल्पातून सहा वर्षानंतर पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 16:49 IST

बुलडाणा, जालना आणि हिंगोली, परभरणी जिल्ह्यातील नदीकाठच्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुलडाणा: जिल्ह्यातील सहा मध्यमप्रकल्पापैकी एक असलेल्या खडकपूर्णा अर्थात संत चोखासागराचे दोन दरवाजे दहा सेंमीने उघडण्यात आले असून या प्रकल्पातून ९७८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी बुलडाणा, जालना आणि हिंगोली, परभरणी जिल्ह्यातील नदीकाठच्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खडकपूर्णा प्रकल्पाचे दोन वर्क दरवाजे दहा सेंमीपर्यंत उघडण्यात येऊन हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. २०१३ मध्ये प्रथमच खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याचा संचय करण्यात आल्यानंतर हिल्याच वर्षी हा प्रकल्प तुडूंब भरल्याने या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यासाठी जवळपास सहा वर्षाचा कालावधी लागला. तेव्हापासून हा प्रकल्प बहुतांश वेळा मृतसाठ्यामध्येच होता. २०१८ च्या दुष्काळात बुलडाणा जिल्ह्यातील नदीकाठच्या जवळपास ४४ गावात पडलेल्या भयंकर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पातून सहा दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. हा अपवाद वगळता या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नव्हते. किंबहूना हा प्रकल्प गेल्या सहा वर्षात पूर्णभमतेने भरलाच नव्हता. या प्रकल्पाची पाणीसाठवण क्षमता ही १६०.६६ दलघमी असून प्रकल्पातील मृतसाठ्याची पातळी ही ६० दलघमी आहे. मराठवाड्यातील गौताळा अभयारण्यातून उगम पावणाºया पूर्णा नदीवर हा प्रकल्प असून मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून दुष्काळाचे सावट असल्याने प्रकल्पात पाण्याचा येवाच कमी झाला होता. यंदाही तिच परिस्थिती होती. मात्र खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येत असलेल्या धामना, बाणगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मधल्या काळात पडलेल्या दमदार पावसामुळे हा प्रकल्पा टप्प्या टप्प्याने भरत गेला असून आजमितीला या प्रकल्पामध्ये ८८.८० दलघमी पाणीसाठा झाला आहे. परिणामी धरण सुरक्षा विभागाच्या निकषानुसार प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्याने प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात आला आहे. प्रकल्प जवळपास पूर्णपणे भरल्यामुळे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल कन्ना, उपविभागीय अभियंता राजेश रोकडे व अन्य अभियंता हे २८ सप्टेंबर पासून धरणावरच मुक्काम ठोकून होते. २७ सप्टेंबर रोजीच नदीकाठच्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर प्रत्यक्षात २९ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास प्रकल्पातून हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

तीन जिल्ह्यातील गावांना सततर्कतेचा इशारा

बुलडाणा, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बु., डिग्रस खु., टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खुर्द, मांडेगाव, राहेरी बुद्रूक, ताडशीवणी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा, खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली, दुधा, सामखेडा, तिवखेडा, हनुमंतखेडा, उस्वद, टाकळखेपा, इंचा, कानडी, देवठाणा, वाघाळा, वझर भामटे, सायखेडा (ता. जिंतूर), धानोरा, सेनगावसह अन्य काही नदीकाठच्या गावांना हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दोन शहरांसह ४४ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला

मराठवाड्याच्या सिमेलगत असलेल्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या दोन शहरांसह बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यातील जवळपास ४४ गावांचा खडकपूर्णा प्रकल्प भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या तीनही तालुक्यात असलेलेले एकूण तीन कोल्हापुरी बंधारेही नदीपात्रात होणाºया विसर्गामुळे भरणार असून मायनर टँक स्वरुपातील हे बंधारे भरल्यास गावातील पाणीसमस्याही बहुतांशी निकाली निघण्यास मदत मिळणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर