शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

शेतक-यांना मिळणार हवामानाची माहिती!

By admin | Published: June 19, 2017 4:27 AM

एसएमएस सुविधा; बुलडाणा जिल्ह्यातील ५0 हजार शेतक-यांना लाभ.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पावसाच्या लहरीपणामुळे बर्‍याच वेळा शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन शेतकर्‍यांना हे नुकसान टाळता येणार आहे. यात एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना हवामानाची माहिती दिली जाणार आहे. शिवाय पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना मिळत आहे.शासनाच्या किसान एसएमएस सेवातून मोबाइलवर मोफत एसएमएस सेवेद्वारे शेतकर्‍यांना शेतीसल्ला दिला जातो. राज्यात २0१३ मध्ये ही सेवा चालू झाल्यानंतर डिसेंबर २0१३ अखेर ६ लाख ५0 हजार एवढी नोंदणी होती. जुलै २0१४ अखेर ८ लाख ५0 हजार एवढी झाली. २0१५ मध्ये राज्यात सुमारे १५ लाख ४१ हजार ३९८, तर मार्च २0१६ पर्यंंंत हा आकडा २0 लाख होता. आता २0१७ मध्ये लाभार्थी शेतकर्‍यांचा आकडा ४५ लाखांवर पोहचला आहे. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, हवामान विभाग व फलोत्पादन या विभागांमार्फत मोफत एसएमएसद्वारा शेतकर्‍यांना कृषी सल्ला मिळतो. आता केंद्राच्या किसान एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती मिळत आहे, तर जुलै २0१७ पासून शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे हवामानाची माहितीही प्राप्त होणार आहे. यामुळे खरीप व रब्बी पेरणी करताना मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात शेतक-यांना मिळणार लाभविविध योजनांचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांकडून मोबाइल नंबर नियमित घेतले जातात. त्यामुळे ३0 हजार ६५७ एवढय़ा शेतकर्‍यांना मोफत एसएमएस कृषी सल्ला दिला जात होता. जिल्ह्यात २0१६-१७ मध्ये १९ हजार ३४३ शेतकर्‍यांचे मोबाईल क्रमांक नव्याने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता किसान एसएमएस सेवा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज समजणार आहे.प्रत्येक १0 मिनिटांनी अंदाजसध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १0 मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकर्‍यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे. यासाठी राज्यात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत.