शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

शहराच्या हद्दीबाहेरील नागरिकांचा वाली कोण?

By admin | Published: May 15, 2017 12:08 AM

नगरपालिकेने केली कर वसुली, मतदान मात्र जिल्हा परिषदेला : नागरी सुविधांसाठी कानावर हात

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : येथील शिक्षक कॉलनी, बालाजी नगर, पवनसुत नगर, तेजस्वी नगर व नवीन वस्ती या भागातील नागरिकांची अवस्था विचित्र झाली आहे. हा परिसर शहरात आहे; मात्र कागदोपत्री मेहकर शहराच्या हद्दीबाहेर करण्यात आला आहे. दुसरीकडे या भागातील नागरिकांकडून नगरपालिकेने कर वसुली केली आणि मतदान मात्र त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत करावे लागले. त्यामुळे या भागाचा विकास करायचा तर पालिका व जिल्हा परिषद हे दोघेही कानावर हात ठेवत आहेत. त्यामुळे आमचा वाली कोण, असा सवाल या नागरिकांचा आहे. मेहकर शहरातील जानेफळ फाट्यापासून ते गजानन महाराज मंदिरापर्यंत गेल्या १० ते १२ वर्षांपासून नवीन वस्ती मोठ्या प्रमाणात तयार झाली आहे. या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांनी आपली नावे नगरपालिकेच्या मतदान यादीमध्ये टाकून घेतलेली आहे. जवळपास ४ ते ५ हजारांच्या आसपास मतदार या भागात आहेत. या नागरिकांनी मागील दोन पंचवार्षिकमध्ये न.पा.च्या निवडणुकीत मतदान केले होते; परंतु यावर्षी या परिसरातील काही भाग नगरपालिकेने न.पा.च्या हद्दीबाहेर टाकल्याने नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता आले नाही; परंतु मतदानापासून वंचित ठेवता येत नसल्याने वंचित राहिलेल्या मतदारांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान केले; मात्र या सर्व घडामोडीमध्ये या परिसराच्या विकासासाठी नगरपालिका किंवा जिल्हा परिषद कोणीही समोर यायला तयार नाही. नगरपालिकेच्या हद्दीत हा भाग नसला, तरी नळाचे पाणी, स्ट्रीट लाइट या दोन सुविधा नगरपालिकेकडून सुरुवातीपासूनच या भागाला मिळतात. इतर सुविधा मात्र हद्दीबाहेर या शब्दात अटकल्या आहेत. जे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नागरिकांनी निवडून दिलेले आहे, ते सदस्य निवडणुका झाल्यापासून दिसेनासे झाले आहेत. तर हद्दीबाहेर असल्याने नगरसेवकही येथून काढता पाय घेत आहेत. या परिसरात जे जुने रस्ते झाले आहेत, त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मेहकरच्या काही भागात नवीन वस्ती झाली, त्या वस्तीत रस्तेच नाहीत. पावसाळा जवळ येत असल्याने या नागरिकांची मोठी पंचाईत होणार आहे. हद्दीबाहेर असलेला हा भाग कोणत्याही ग्रा.पं.ला जोडलेला नाही, तर नगरपालिकेमध्येसुद्धा नाही. त्यामुळे रस्ते व इतर विकासासाठी या परिसरातील नागरिकांनी नेमकी कोणाकडे मागणी करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज हद्दीबाहेर गेलेल्या या परिसरातील नागरिकांनी खासदार, आमदार यांना मतदान केलेले आहे, तर माजी नगरसेवकांनासुद्धा मागील वेळेस मतदान केलेले आहे. त्यामुळे केवळ हद्दीबाहेर हा मुद्दा धरून या परिसरातील विकासाकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे. निवडणुका आल्या, की या परिसरातील नागरिकांचा मतदानापुरता उपयोग करून घ्यायचा व नंतर हद्दीबाहेर आहे म्हणून विकासाकडे दुर्लक्ष करायचे, हे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आजी-माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सदर समस्या सोडविण्याची गरज आहे.राजकारणातील गटबाजी नागरिकांसाठी डोकेदुखी सध्या शिवसेना पक्ष थोड्याफार प्रमाणात सोडला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सर्वच पक्षात गटबाजी आहे. जो-तो आपला वेगळा गट तयार करून पक्षश्रेष्ठींसमोर वजन वाढविण्याच्या प्रयत्न करीत आहे. पक्षातील या गटबाजीमुळे नवीन वस्तीतील काही भाग हद्दीबाहेर गेलेला आहे. मात्र, या परिसरातील नागरिकांची स्थिती म्हणजे देवळातील घंट्यासारखी झाली आहे. राजकारणतील गटबाजी ही या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.