शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुष्काळात वन्यजीव तहानेने व्याकूळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 17:43 IST

बुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. तर कृत्रिम पानवठ्यांची स्थिती चिंताजनक असून अनेक हातपंप बंद आहेत. यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातीलवन्यजीव तहानले आहेत. अत्यल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात हिवाळ्याच्या सुरूवातीपासून पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली होती. सध्या पाणीटंचाईवर प्रशासनाला चांगलेच काम लागले आहे. पाण्याचा थेंबही नसलेल्या गावांमध्ये टँकर सुरू करणे, ज्याठिकाणी खासगी विहिरींना थोडेबहुत पाणी आहे, अशा विहिरी अधिग्रहीत करणे, यासारख्या उपायोजना पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येत आहेत. कमी पर्जन्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुके व २१ महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. तर १५ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या दुष्काळाच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी भागातच नाहीत; तर वन्यजीवांनाही बसत आहे. जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबरवा, लोणार यांसारखी मोठ-मोठी अभयारण्ये असून येथे वेगवेगळ्या प्रजातींचे असंख्य वन्य प्राणी अधिवास करतात. बुलडाण्यापासून आठ किलोमीटरवर तर खामगावपासून २० किलोमीटरवर ज्ञानगंगा नदीशेजारी वसलेल्या २०५.२१० चौरस किलोमीटरच्या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. या अभयारण्यात बिबट, हरिण, काळवीट, रानमांजर, जंगली कुत्रे, तरस, लांडगा, रानडुक्कर, नीलगाय, माकड, वटवाघूळ, अस्वल यांसारखे वन्यजीव मुक्तपणे संचार करतात. स्थानिक तर काही स्थालांतरित अशा वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अशा एकूण १५० प्रजाती या अभयारण्यात आढळून येतात. मात्र सध्या या अभयारण्यातील वन्यजीवांची पाण्यासाठी वाताहात होत आहे. येथे कृत्रीम पानवठे व नैसर्गीक पानवठे असूनही वन्यजीवांच्या घशाला कोरड पडत आहे. 

हातपंप बंद!ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये कुत्रिम पानवठे ३८ आहेत. तर हातपंप सात आहेत, त्यातील तीन हापंपत सध्या सुरू आहेत. मात्र चार हातपंप बंद स्थितीत आहेत. नैसर्गिक पानवठ्यांमध्ये लाखेचा झिरा, काशी नळकुंड, लांब डोह, ऋषिबाचा खोरा यांचा समावेश आहे. 

लोणार अभयारण्यातील पानवठे कोरडेलोणार अभयारण्यामध्ये विविध प्रजातीचे वन्यप्राणी आहेत. मात्र सध्या या अभयारण्यातील पानवठे कोरडे पडल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. यासंदर्भात वनसंरक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधता असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. 

या दुष्काळाच्या झळा वन्यजीवांनाही बसत आहेत. त्यांच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातील उत्तर देव्हारी मधील पानवठा क्रमांक तीनची हापसी दुरुस्त करून देण्यात यावी तसेच अभयारण्यात इतर ठिकाणी असलेले हातपंप दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी वनविभागाकडे केलेली आहे. - नितिन श्रीवास्तववन्यजीव सोयरे, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यwildlifeवन्यजीवdroughtदुष्काळ