शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

मलकापूर पांग्रा ग्रामपंचायत कार्यालयात महिलांचा घागर माेर्चा

By संदीप वानखेडे | Published: June 23, 2023 3:49 PM

माेर्चात सहभागी चार ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे, १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा

संदीप वानखडे, मलकापूर पांग्रा (बुलढाणा): नळ याेजनेसाठी दाेन काेटी ९० लाख रुपये मंजूर हाेऊनही मलकापूर पांग्रा येथे १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा हाेत आहे. पाणीटंचाईने त्रस्त महिलांनी २३ जून राेजी ग्रामपंचायत कार्यालयात माेर्चा काढला. माेर्चात सहभागी झालेल्या चार ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

गत चार महिन्यांपासून मलकापूर पांग्रा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आठ हजार लाेकसंख्या असलेल्या गावात १५ ते २० दिवस एकेका वाॅर्डात नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा हाेताे. दुसरीकडे काही भागात दरराेज पाणीपुरवठा हाेत आहे. पाणी द्या, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घाेषणा देत महिला व नागरिकांनी शुक्रवारी हंडा माेर्चा काढला. गावातील नळ याेजनेसाठी दाेन काेटी ९० लाख रुपये मिळाले आहेत, तरीही पिण्याच्या पाण्यासाठी मलकापूर पांग्रावासीयांना भटकंती करावी लागते. मुबलक पाणी असतानाही पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो़. महिलांनी पाणी मिळत नसल्याकारणाने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. शेख हनीफ शेख कादर बागवान यांच्या नेतृत्वात हा माेर्चा काढण्यात आला. पाण्यासाठी सरपंच, उपसरपंच उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला. या निवेदनावर जवळपास २०० ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे. पाणीटंचाईवर उपाय याेजना न केल्यास तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.

‘या’ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे

गावातील पाणीटंचाई तीव्र झाल्याने तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून उपाय याेजना करण्यात येत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य समीना बी़. शेख, निसार पटेल, किरण काकडे, राजू साळवे, साबीर खान पठाण आदींनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा दिला आहे. गावातील पाणीटंचाईचा प्रश्न पेटल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा