शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

२२ लाख आयटी प्रोफेशनल नोकऱ्या सोडणार; भारतात इंडस्ट्रीला घरघर, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 4:50 PM

आयटी सेक्टरला भारतीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका रिपोर्टनुसार IT-BPM क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

आयटी क्षेत्रामुळे गेल्या दोन दशकांत भारताला सोन्याचे दिवस आले आहेत. आयटी सेक्टर वाढल्याने करोडो लोकांना रोजगार मिळाला आहे. घरांची मागणी, वाहनांची मागणी, जीवनावश्यक वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, याच आयटी सेक्टरला आता घरघर लागण्याची चिन्हे आहेत. आयटी प्रोफेशनल्सची संख्या घटू लागल्याने बड्या बड्या आयटी कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत. 

आयटी सेक्टरला भारतीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवू लागली आहे. एका रिपोर्टनुसार IT-BPM क्षेत्रातील नोकरी सोडणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा वेग कमालीचा वाढू लागला आहे. असेच सुरु राहिले तर २०२५ पर्यंत २२ लाख आयटी प्रोफेशनल नोकरी सोडण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेला एट्रिशन रेट म्हटले जात आहे. स्वेच्छेने नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दराची मोजमाप करण्यासाठी ही व्याख्या वापरली जाते. 

या रिपोर्टनुसार ५७ टक्के आयटी प्रोफेशनल पुन्हा कधीही आयटी सेक्टरमध्ये परतणार नाहीएत. पगार वाढल्याने चांगली कामगिरी करता येईल आणि समाधान मिळेल, असे या कर्मचाऱ्यांना वाटत आहे. टीम लीज डिजिटलचे सीईओ सुनील चेम्मनकोटील यांच्यानुसार भारतीय आयटी क्षेत्राने गेल्या दशकात चांगली वाढ पाहिली आहे. IT क्षेत्राने 15.5 टक्के वाढ नोंदवली असून, आर्थिक वर्ष 2022 मध्ये 5.5 लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. सध्याच्या काळात कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम दोन्ही बदलले आहेत.हे कर्मचारी आपल्या कामाचे स्वरुप आणि त्यांच्या करिअरचा आढावा घेत आहेत. यावर काही फरक दिसताच हे कर्मचारी आपली नोकरी अर्ध्यातच सोडून अन्य कामांकडे वळू लागले आहेत, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

कर्मचाऱ्यांचे काय म्हणणे आहे...50 टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की आयटी क्षेत्रातील कर्मचारी चांगले उत्पन्न आणि फायदे नसल्यामुळे नोकऱ्या सोडत आहेत. तर 25 टक्के लोकांचे म्हणणे आहे की करिअरमध्ये वाढ न होणे हे नोकऱ्या सोडण्याचे मुख्य कारण आहे. 2021 मध्ये नवीन-युगातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली आहे, यामुळे देखील नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.  

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी