शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

१० लाखांचे रोपवन गायब

By admin | Published: May 12, 2017 2:20 AM

निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी वृक्षलागवड करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

कुंपणानेच शेत खाल्ले : गोंडी विहिरगाव येथील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क मूल : निसर्गाचा समतोल अबाधित राहावा, यासाठी वृक्षलागवड करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम अंमलात आणला. मात्र वन विभागातील कर्मचारी व अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वृक्षलागवडीचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यास बाधा निर्माण होत असल्याचा प्रकार चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मौजा गोंडी विहिरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मध्ये बघितल्यानंतर दिसून येते. रोपवनावर १० लाख रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष झाल्याने रोपे करपली. आजच्या स्थितीत सदर जागेवर एकही रोप नसून झाडे झुडपे वाढली असल्याचे दिसून येते. यावरुन कुंपनानेच शेत खाल्ले की काय, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. शासन स्तरावर रोपवन लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन त्यांचे संगोपन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे. मात्र चंद्रपूर वनविभागाअंतर्गत चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मौजा गोंडी विहिरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मध्ये जुलै २०१० मध्ये ५० हेक्टर जमिनीवर मिश्र रोपे लावण्यात आली. संयुक्त वनव्यवस्थापन समिती ताडाळाच्या वतीने करण्यात आलेल्या या रोपवनासाठी पाच वर्षांपर्यंत १० लाख रुपये खर्च करण्यात आले. सतत पाच वर्षे रोपावर खर्च निधी दाखविण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात त्या जमिनीवर एकही रोपण केलेला वृक्ष आढळत नसल्याने सतत पाच वर्षे कुठल्या रोपावर निधी खर्च केला, हा प्रश्नच आहे. या रोपवनासाठी रोप आणणे, खड्डे खोदणे, कुंपन करणे आदींवर लाखो रुपये करण्यात आले. संयुक्त वनव्यवस्थापन समिती ताडाळाच्या वतीने सदर जागेवर मिश्र रोपे लावण्यासाठी वनविकास यंत्रणा चंद्रपूरच्या वतीने ३१ मार्च २०१० ला समितीला दोन ६१ हजार २५० रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. त्यानंतर २ जुलै २०११ ला ३ लाख ६१ हजार रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. २१ मार्च २०१४ पर्यंत १० लाख २६ हजार १२४ रुपये प्राप्त झाले. सतत पाच वर्षे रोपावर निधी खर्च दाखविण्यात आला. रोपे वाढविण्यासाठी प्रयत्नच झाला नसल्याचे दिसून येते. आजच्या स्थितीत मूल तालुक्यातील गोंडी विहीरगाव येथील कक्ष क्र. ७५३ मधील ५० हेक्टर संरक्षित वनामध्ये एकही रोप आढळून येत नाही. आजच्या स्थितीत एकही रोप दिसत नसल्याने कुंपनानेच शेत खाल्ले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील या गोंडी विहीरगाव येथे असा प्रकार होत असेल तर इतरही ठिकाणी काय स्थिती असावी, याचा विचार न केलेलाच बरा.