शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींना आता नव्या इमारती; निधी उपलब्ध, काम झाले सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:22 IST

ग्राम स्वराज्य योजनेतून निधी : काम प्रगतिपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कामही सुरू करण्यात आले आहे.

गावांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन शासनाने विविध योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू केली आहे. गावाच्या विकासात ग्रामपंचायतींचे विशेष महत्त्व आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींचा कारभार आजही कौलारू इमारतीतून चालवला जात होता. काळाच्या ओघात काही इमारती जुन्या झाल्या. पावसाचे पाणी गळण्यास सुरुवात झाली. पावसाच्या पाण्यामुळे ग्रामपंचायतींमधील गावकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. काही इमारतींचे काम प्रगतिपथावर आहे. जिल्ह्यातील काही मोजक्या ग्रामपंचायती सोडल्या तर जवळपास सर्वच ग्रामपंचायतींच्या इमारती आता पक्क्या झाल्या आहेत. नागरिकांचे दस्तऐवज आता ग्रामपंचायतीत सुरक्षित राहणार आहेत. 

अशी राहणार इमारत...नवीन इमारतीमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. स्वच्छतागृह, स्वत्रंत पाणीसुविधा, सरपंचासाठी कक्ष राहणार आहे.

कामात येणार गतीनवीन इमारतींमुळे प्रशासकीय कामाला गती देण्यास मदत होणार आहे. गावातील नागरिकांच्या दस्तऐवजाचे संरक्षणसुद्धा होणार आहे.

दुर्गम भागातील ग्रामपंचायतींकडे अधिक लक्ष

  • जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीचे कार्यालय नव्हते. अशा गावामध्ये आता चकाचक ग्रामपंचायत इमारत बघायला मिळणार आहे.
  • जिल्ह्यात विसापूर, दुर्गापूर, 3 ऊर्जानगर आदी ग्रामपंचायती मोठ्या असून, कारभार सुसज्ज इमारतीतून चालविता जातो. दरम्यान, आजही काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण झाल्या आहे.

नवीन इमारती प्रशस्तनवीन इमारती आधुनिक पद्धतीने बांधल्या जात आहेत. त्यामुळे त्या मजबूत असण्याबरोबरच त्यात अनेक सुविधा उपलब्ध राहणार आहेत. प्रशस्त असल्याने नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे.

या ठिकाणी नवीन इमारतीज्या गावामध्ये ग्रामपंचायतीची इमारत नव्हती, भाड्याच्या इमारतीतून कारभार चालविला जात होता, अशा गावांत नव्याने इमारत बांधकाम केले जाणार आहे. विशेषतः काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे कार्यालय जीर्ण झाले होते. त्यामुळे आता नव्या इमारतीतून कारभार चालविला जाणार आहे.

२० लाख सरपंच, सचिवांनी स्वतंत्र कक्ष राहणाररुपयांचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअंतर्गत काम सुरू आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर