शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
4
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
5
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
6
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
7
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
8
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
9
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
10
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
11
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
12
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
13
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
14
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
15
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
16
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
17
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
18
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?
19
SIP मध्ये मिळतात असे ७ फीचर्स जे दुसऱ्या स्कीम्समध्ये मिळत नाहीत, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या
20
भारतासाठी 'करो वा मरो'चा सामना; 'कॅप्टन' हरमनप्रीत आज खेळणार? स्मृती मंधानाने दिली अपडेट

१२ हजार हेक्टर क्षेत्राला मिळाले सिंचन

By admin | Published: September 26, 2016 1:16 AM

राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाने चंद्रपूर जिल्ह्यातही आशादायक चित्र निर्माण केले आहे.

जलयुक्त शिवार अभियान : ३२ उपाययोजनांद्वारे सिंचनवाढचंद्रपूर : राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाने चंद्रपूर जिल्ह्यातही आशादायक चित्र निर्माण केले आहे. या अभियानातून तब्बल १२ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ३२ प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे यावर्षीच्या पावसाचे पाणी जमा होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. याशिवाय अभियानामुळे अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.जिल्ह्यात १९७७ दगडी बंधारे घालण्यात आले आहेत. त्यातून १०५ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला. १३६० गॅबियन स्ट्रक्चरचे काम करण्यात आले आहे. त्याकरिता १ कोटी १२ लाख ८३ हजार रुपये खर्च करण्यात आले. सहा ठिकाणी माती नाला बांध घालण्यात आले आहेत. त्यातून ४४.८६ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होऊन २० हेक्टर जमिनीला सिंचन करणे शक्य झाले. ३२ माती नालाबांधाची दुरूस्ती करून १०२ हेक्टरचे सिंचन करण्यात आले. या अभियानात १२ हजार ३६६ हेक्टरवर ३१२ ढाळीच्या बांधांची कामे करण्यात आली आहेत. त्यापैकी ७९६४ हेक्टर क्षेत्रातील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यातून १०२५.७५ हेक्टर क्षेत्रामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ७७० बोडींचे नूतनीकरण व खोलीकरण करण्यात येत असून ७५२ कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे ६५३.६२ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला. या बोडींमुळे ३९८.३५ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. १३ साठवण बंधाऱ्यांची कामे घेण्यात आली. त्यामुळे ४४७.२६ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा तयार झाला. या पाण्यातून ८९४.५२ हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. ३३२ सिमेंट नाल्याच्या बांधामुळे १३८७.३९ हेक्टरला सिंचन झाले. १७८ तलावाच्या खोलीकरणातून ९५४.३ हेक्टर क्षेत्राचे सिंचन करणे शक्य झाले. याशिवाय कोल्हापुरी बंधारे, विहिरींचे पुनर्भरण, तुषार सिंंचन-ठिबक सिंचनाची कामे, उपसा सिंचन योजना, लघु पाटबंधारे पाझर तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती आदी कामे करण्यात आली आहेत.सर्वाधिक २०२० शेततळ्यांची कामेजिल्ह्यात सर्वाधिक कामे शेततळ्यांची करण्यात आली आहे. तब्बल २ हजार २० शेततळ्यांचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी १७६१ शेततळ्यांचे काम सुरू करून १७१३ शेततळी पूर्ण झाली आहेत. ४८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. शेततळ्यांच्या माध्यमातून २२६२.४७ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. त्यातून १ हजार ७६ हेक्टर शेतीला सिंचन उपलब्ध झाले आहे. या सर्व कामांवर आतापर्यंत १२ कोटी ८८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. गाळ काढल्यामुळे सर्वाधिक सिंचन जलयुक्त शिवार योजनेत कृषी विभागाने ३२१ गाळ काढण्याची कामांपैकी ३०५ कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे तब्बल २६०४.१९ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आहे. त्याखालोखाल मजगी वा भातखाचऱ्यांच्या कामांमुळे सिंंचन निर्माण झाले आहे. ही ५४७ कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी ५५२ मजगीची कामे पूर्ण झाली आहेत. मजगी करण्यासाठी ७ कोटी ६८ लाख ७६ हजार रुपये खर्च करण्यात आले. त्या माध्यमातून तब्बल २४९०.२९ टीएमसी पाणीसाठा तयार करणे शक्य झाले. परिणामती १८७१.८९ हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली आली आहे. २७५ मजगींचे पुनरूज्जीवन करण्यात आले. गेल्या वर्षीची शिल्लक कामे धरून ३११ मजगींचे पुनरूज्जीवन करणे शक्य झाले. त्याद्वारे ५३१.८९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.