शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
2
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
3
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
4
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
6
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
7
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
8
Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान, म्हणाले, "काळ्या रंगामुळे मला..."
9
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
10
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
11
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
12
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
13
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
14
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
15
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
16
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
17
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
18
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
19
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
20
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...

आमडी उपसा सिंचन योजनेचा २० वर्षांचा वनवास संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:18 AM

१० गावांतील शेतकऱ्यांची जमीन येणार सिंचनाखाली : २० वर्षात १९.३९ कोटींची योजना पोहचली ९९ कोटींवर मंगल जीवने बल्लारपूर : ...

१० गावांतील शेतकऱ्यांची जमीन येणार सिंचनाखाली : २० वर्षात १९.३९ कोटींची योजना पोहचली ९९ कोटींवर

मंगल जीवने

बल्लारपूर : मागील २० वर्षांपासून तांत्रिक कारणाने अडकलेली बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव आमडी उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर असून आता ही योजना पूर्णत्वाच्या टप्प्यावर आली आहे. यामुळे बल्लारपूर तालुक्यातील १० गावांतील अंदाजे एक हजार ८८६ शेतकऱ्यांच्या २ हजार ४६२ हेक्टर शेतींना सिंचनाची सोय होणार आहे.

याबाबतची नुकतीच तहसील कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती आहे. बल्लारपूर तालुक्यातील कोरडी पडत असलेली जमीन पाण्याखाली येणार की नाही या विचारात गुरफटलेल्या शेतकऱ्यांची भावना ओळखून राज्य शासनाने २००१ मध्ये आमडी पळसगाव उपसा सिंचन योजना मंजूर करून बळीराजाच्या आशा पल्लवित केल्या. यामुळे पळसगाव, आमडी, कळमना, किन्ही, केमतुकूम, दहेली, बामणी, दुधोली, कोर्टी मक्ता,कवडजई या दहा गावांतील १ हजार ८८६ शेतकऱ्यांची २ हजार ४६२ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.

मागील काही वर्षांपासून सतत होणाऱ्या नापिकीमुळे त्रस्त झालेले तालुक्यातील शेतकरी शेती विकू लागले आहे. अशात उपसा सिंचन योजनेच्या पूर्णत्वाने बळीराजाला बळ मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० वर्षाआधी तत्कालीन राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडे व सिंचन राज्यमंत्री डॉ.अनिल देशमुख यांनी आमडी पळसगाव उपसा सिंचन योजना प्रकल्प त्वरित सुरू करण्याचे फर्मान काढले होते. त्यावेळेस या योजनेला १९.३९ कोटींचा निधी लागणार होता. आजघडीला मात्र हा खर्च वाढून ९९ कोटीपर्यंत गेला आहे. ॲड. बाबासाहेब वासाडे यांनीही हा प्रकल्प पूर्णत्वास यावा यासाठी २००६ मध्ये भरपूर प्रयत्न केले. परंतु हा प्रकल्प मधेच अडगळीत पडला व पूर्णत्वास येण्यासाठी १० गावांतील शेतकऱ्यांना २० वर्ष वाट पाहावी लागली आहे.

बॉक्स

अडथळा झाला दूर

एका व्यक्तीने आमडी येथील शेतातून जाणारी पाईप लाईन टाकण्यास अडथळा आणून काम थांबविण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार पाटबंधारे विभागाने बल्लारपूरचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. ही तक्रार तहसीलदार संजय राईंचवार यांच्याकडे येताच त्यांनी मध्यस्थीने तोडगा काढला व उपसा सिंचन योजनाचे काम सुरू झाले आहे. आता ही योजना येत्या दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता लघु पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.

कोट

हा प्रकल्प तालुक्यातील आमडी जवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या काठी आहे. ही योजना लवकरात सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदीवर पंप बसवले आहे. परंतु नदीमधील अप्रोचचे काम व्हायचे आहे. पाईपमध्ये गाळ येऊ नये म्हणून स्ट्रक्चर बांधायचे आहे. बंद नलिका वितरण प्रणालीचा वापर करून शेतात पाणीपुरवठा होणार आहे. सध्या काम प्रगतीपथावर आहे.

-प्रमोदकुमार वाकुडे,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे विभाग,चंद्रपूर.

कोट

तालुक्यात कृषी विकासाची गती वाढवायची असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना बळ दिले पाहिजे. त्यांच्या मनात आत्मविश्वास तेव्हाच जागेल, जेव्हा बहुप्रतीक्षित उपसा सिंचन योजना प्रत्यक्ष सुरू होईल.

-

संदीप वेटे, सरपंच, ग्रामपंचायत, पळसगाव.

कोट

आमडी उपसा सिंचन योजना बळीराजाच्या हितासाठी आहे. तालुक्यात बारमाही पाण्याची सोय नाही, सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या प्रकल्पाचा बामणीच्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

-सुभाष ताजने,सरपंच, ग्रामपंचायत बामणी, दुधोली