शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
3
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
4
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
5
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
6
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
7
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
8
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
9
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
10
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
11
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
12
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
13
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
14
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
15
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
16
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
17
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
18
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
19
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
20
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल

आणखी २०० बँका दिवाळखोरीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 10:47 PM

बाबाजी दाते महिला बँकेप्रमाणेच देशातील सुमारे दोनशेहून अधिक सहकारी बँका दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. नव्या कायद्यानुसार खासगी बँकांप्रमाणेच सहकारी बँकाही आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आहेत. सध्या देशात १४८२ सहकारी बँका आणि ५८ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी राज्यातील बँकांची बॅलन्स शीट तपासली जाते. त्यावरून बँकेची आर्थिक स्थिती पुढे येते. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँकेचे लायसेन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केले असून, या बँकेमध्ये पाच जिल्ह्यांतील १९ शाखांमधील ३६ हजार ग्राहकांचे पैसे अडकले आहेत. यातील पाच लाखांपर्यंत ठेवी अडकलेल्या खातेदारांना पैसे परत देण्यात येत असले तरी पाच लाखांवरील पैशांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, बाबाजी दाते महिला बँकेप्रमाणेच देशातील सुमारे दोनशेहून अधिक सहकारी बँका दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत.नव्या कायद्यानुसार खासगी बँकांप्रमाणेच सहकारी बँकाही आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आहेत. सध्या देशात १४८२ सहकारी बँका आणि ५८ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी राज्यातील बँकांची बॅलन्स शीट तपासली जाते. त्यावरून बँकेची आर्थिक स्थिती पुढे येते. मागील काही वर्षांमध्ये सहकारी बँकांच्या थकीत, तसेच बुडीत कर्जांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. अशाच सुमारे ५० बँका सेक्शन ३५-ए मध्ये आल्या होत्या. त्यांतील २० पेक्षा अधिक बँकांचे लायसेन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केल्याने या बँकांतील           लाखो ठेवीदार अडचणीत आलेले आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकारीसह सर्व प्रकारच्या बँकांनी डीआयसीजीसी (डिपॉझिट इन्शुरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन)द्वारे विमा उतरविणे आवश्यक आहे. कायद्यानुसार काॅर्पोरेशन विमा उतरविलेल्या बँकेच्या ठेवीदारांना विम्याची ठेव रक्कम देण्यास डीआयसीजीसी जबाबदार आहे. डीआयसीजीसीकडून अंतरिम पेमेंट फ्रिझच्या ९० दिवसांच्या आत प्राप्त होते. यामध्ये विमाधारकाला थकीत ठेवीचे तपशील बँकेकडे ४५ दिवसांत द्यावे लागतात. या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी महामंडळ ३० दिवस घेते आणि त्यानंतर १५ दिवसांत हे पेमेंट ठेवीदारापर्यंत पोहोचविणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ पाच लाखांपर्यंतच्या ठेव रकमेचाच विमा काढला जात असल्याने त्यापेक्षा अधिक रक्कम अडकलेल्या खातेदारांचे आणि त्यांच्या कोट्यवधी रुपयांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ठेवीदारांनी सावधगिरी बाळगण्याची गरजया नव्या कायद्यानुसार जानेवारी २०२२ पर्यंत १.२ लाख ठेवीदारांना त्यांच्या दाव्यांच्या विरोधात दीड हजार कोटीहून अधिक रक्कम डीआयसीजीसीकडून अदा केली आहे. मात्र, लाखो खातेदार असे आहेत, ज्यांची पाच लाखांपेक्षा अधिकची रक्कम बुडीत बँकांमध्ये अडकली आहे. ही रक्कम मिळण्यासाठी यापुढील काळात लढा लढावा लागेल असेही डिपॉझिटर्स प्रोटेक्शन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीचे सेक्रेटरी विश्वास उटगी यांनी सांगितले.

बँक ठेवीदार संघटनेने मे २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर ऑगस्ट २०२० मध्ये उच्च न्यायालयाचे न्या. काथावाला यांनी निर्णय देत पाच लाखांपर्यंतची रक्कम लिक्विडेशनआधीच खातेदारांना देण्यास डीआयसीजीसीला भाग पाडले. या निर्णयामुळे लिक्विडेशनपूर्वी ९० दिवसांत पाच लाखांपर्यंतची रक्कम देण्याचा संसदेत कायदा करण्यात आला. मात्र, पाच लाखांवरील रकमेचे काय? असा आमचा प्रश्न आहे. - विश्वास उटगी, सेक्रेटरी बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेल्फेअर सोसायटी 

 

टॅग्स :bankबँक