शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

१८ गावांमधील ३० महिलांनी दिली कृषी विकासाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 11:33 IST

Chandrapur News मूल तालुक्यातील १८ गावातील काही महिला शेती करीत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेती कसत आहेत.

ठळक मुद्देशेतात राबत घेतले भरघोस उत्पादन १८ गावातील ३० महिलांचा सन्मान

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे शेतकरी शेती कसायला मागे पुढे पाहतो, त्यातच युवापिढीला शेती करण्यात रस नाही. असे असताना काही महिलांनी शेती व्यवसायात गुंतत कृषी विकासाला चालना दिली आहे. योग्य नियोजन करून शेती केल्यास शेतीतून चांगल्या पध्दतीने उत्पन्न घेता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. १८ गावातील या ३० शेतकरी महिलांचा कृषी विभागामार्फत महिला किसान दिनी सन्मानही करण्यात आला.

मूल तालुक्यातील १८ गावातील काही महिला शेती करीत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेती कसत आहेत. अपुरे सिंचन सुविधेमुळे काही शेतकरी शेती विक्री करीत असतानाच काही महिला त्यास विरोध करून मिळून शेती करण्यास पुढाकार घेत आहेत. ठिंबक सिंचनाचा माध्यमातून धानशेती करण्याकडे तालुक्यातील शेतकरयांचा विशेष कल आहे. काही महिला मोग?्याच्या फुलबाग तयार करून त्यापासून उत्पन्न घेत आहेत. नविन तंत्रज्ञानाचा वापर करून काही महिला शेतकयांनी भाजीपाला लागवड केली आहे.घरीच असलेल्या गाय, बैल, म्हशीच्या शेणापासून शेणखत तयार करून त्या खतापासून सेंद्रीय भाजीपालाचे उत्पादन घेत आहेत. घरी असलेल्या खुल्या जागेत काही महिला परसबाग तयार करून त्यापासूनही घरघुती लागणारा भाजीपाल्याचे उत्पन्न घेत आहेत. या शेतकरी महिलांसह शेतमजूर महिला व कृषी उत्पादनात विशेष आवड असलेल्या ३० महिलांचा कृषी विभागानेही दखल घेतली असून कृषी दिनानिमित्स या महिलांचा सन्मान केलेला आहे. या महिलांकडून प्रेरित होऊन इतर महिलांनी व शेतकऱ्यांनी शेतीत तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे.या शेतकरी महिलांनी केली किमयामूल तालुक्यातील मनिषा घोडमारे, योगीता कस्तुरे, संध्या कुंभरे, सुनंदा चलाख, मिना नाहगमकर, खामादेवी पेटीवार, भावना जुमनाके, अश्विनी बोलीवार, अल्का कोहपरे, मंगला बोरकुटे, बाली रायपूरे, जयश्री सोनूने, रेवता सोनूने, लिलाबाई देवतळे, उषा सिडाम, कांता मुनगटीवार, संगिता गणवीर, शालिनी लेनगुरे, भाग्यश्री ओदलवार, शिला जनबंधु, सुवर्णा दहिवले, वर्षा भुरसे, स्नेहा चलाख, सुनिता मानकर, वर्षा मानकर, सुरेखा चुनारकर, खुशी लाकडे, नंदा शेंडे, आशा गेडाम या महिलांनी शेतात राबत भरघोस उत्पादन घेत किमया साधली आहे१८ गावातील सुमारे ३० महिलांनी कृषी विकासाला चालना दिली आहे. आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. यामुळे इतर महिलांना कृषीवर आधारित काम करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.-आर.एस. उईके,कृषी पर्यवेक्षक,मूल.

 

टॅग्स :agricultureशेती