शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

चंद्रपूर जिल्ह्यात ३५ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचताही येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:41 AM

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेतली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या गुणवत्ता चाचणीचा धक्कादायक निष्कर्ष

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने (डीआयईसीपीडी) चंद्रपूर जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार ६१४ शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेण्यात आली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) मागील चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. अध्यापन, अध्ययन, बदलते अभ्यासक्रम आणि ज्ञान संरचनावादी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता व बौद्धीक दर्जा तपासणीचे अनेक प्रयोग सुरू आहेत. संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार ६१४ शाळांमधील १ लाख ७ हजार ५२८ विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. यापैकी ९८.९० टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. भाषा विषयात उतारा वाचन, स्वरचिन्हांसह शब्दवाचन, स्वरचिन्ह विरहित शब्दवाचन तसेच प्रारंभिक असे चार स्तर करण्यात आले. यानुसार दुसरी ते चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ६४.३९ टक्के विद्यार्थ्यांना उताऱ्याचे वाचन करता आले. जिवती व पोंभुर्णा तालुका सर्वात मागे असून ब्रह्मपुरी (६४.४६) व मूल (७२.०३), तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. जिवती ३६.३६ टक्के व पोंभुर्णा तालुक्यातील ५०.०७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन करता आले. सावली, बल्लारपूर, राजुरा, कोरपना तालुक्याची टक्केवारी ५१ ते ६० दरम्यान आहे. चंद्रपूर, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, वरोरा, भद्रावती तालुक्याची टक्केवारी ६१ ते ७० आहे. मागील वर्षाच्या मराठी भाषा उतारा वाचनाची टक्केवारी ८२.५६ होती. यंदाच्या शैक्षणिक सत्रात ६४.३९ टक्के आढळली. तुलनात्मकदृष्ट्या ही तफावत १८.१७ टक्के आहे. त्यामुळे मागील वर्षी उतारा वाचन करण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १८.१७ टक्के विद्यार्थी मागे कसे पडले, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

शिक्षकांनीच घेतली चाचणीच्संस्थेच्या निर्देशानुसार चाचणी घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य वर्गशिक्षकांनाच दिले होते. मात्र, मराठी विषयाच्या वाचनात ३५.६१ टक्के विद्यार्थी मागे पडले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षकांवरच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

गणितातही पिछाडीच्गणित विषयाची सहा स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली. गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, संख्याज्ञान या टप्प्यांमध्ये भागाकार हा पहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, इयत्ता चौथी ते आठवीतील ३६.८५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच करता येत नसल्याचे चाचणीतून उघड झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १९.७६ टक्क्यांची तफावत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र