शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ३८५ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:22 IST

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यात ३८२ नवीन कुष्ठरूग्ण मिळाल्याची माहिती पुढे आली. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे देशात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यात नमूद केले.

ठळक मुद्देजागृतीमुळे रूग्ण संख्येत घट : पोंभुर्णा, सिंदेवाही, मूल तालुक्यात सर्वाधिक रूग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यात ३८२ नवीन कुष्ठरूग्ण मिळाल्याची माहिती पुढे आली. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे देशात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यात नमूद केले.कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. मागील काही वर्षांपासून आरोग्य विभागाने कुष्ठरोग शोधमोहिम जोमाने सुरू केली होती. यावर्षीदेखील १४ दिवसांची कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यामध्ये १६ लाख ५५ हजार ३४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केल्या गेली. आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवकाद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. शहरी भागात २२५ तर ग्रामीण भागात १२३५ असे जिल्ह्यात एकूण १६० पथकाद्वारे शहरी भागातील एक लाख २८ हजार ९३३ व ग्रामीण भागातील १४ लाख पाच हजार ५३२ नागरिकांची तर महानगरपालिका क्षेत्रातील एक लाख २० हजार ९०२ अशा एकूण १६ लाख ५५ हजार ३४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात पाच हजार २३० संशयित रूग्ण आढळून आले. या सर्व संशयित रूग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती. त्यातील ३८२ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार कुष्ठरोगाचे सर्वात जास्त प्रमाण मूल, पोंभूर्णा, सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यात आढळून आल्याचे सांगितले. याचे कारण म्हणजे या क्षेत्रात असलेले घनदाट जंगल, धानाची शेती, लोकात असणारी रोगप्रतिकार शक्तीची कमतरता व कुष्ठरोग जंतू निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण असणे यामुळे या भागात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढत आहे.कुष्ठरोग निर्मूलनाकरिता शासनाच्या आरोग्य विभागाद्वारा जनजागृतीवर जास्त भर दिला जात आहे. नागरिक जागरुक झाले आहे. लोक स्वत: दवाखान्यात येऊन कुष्ठरोगाचे उपचार करताना दिसतात. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नि:शुल्क तपासणी केली जात असून याचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.नियमित औषध व उपचाराने आजार नियंत्रणातकुष्ठरोगावर नियमितपणे औषधोपचाराने आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. मागील दहा वर्र्षांत कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. सहा ते बारा महिन्याच्या उपचारानंतर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. शरीरावर पाच किंवा यापेक्षा कमी चट्ट्याचे व्रण असल्यास सहा महिन्यांचा उपचार दिला जातो तर यापेक्षा अधिक चट्टे असल्यास एक वर्ष औषधोपचार करणे अनिवार्य आहे.