शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

चंद्रपुरात ५३ हजार १३६ कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा

By राजेश मडावी | Updated: June 27, 2023 15:07 IST

महाआवास अभियान : प्रधानमंत्री आवास ३३८०५ तर राज्यपुरस्कृत १९३३१ घरकूल बांधकाम पूर्ण

चंद्रपूर : ‘सर्वासाठी घरे २०२४’ हे केंद्र व राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या ध्येयपूर्तीसाठी व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी महाआवास अभियान ३.० (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. शिवाय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त अमृत महाआवास अभियान सुरू आहे. या अभियानांची फलश्रुती म्हणून केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ग्रामीण भागात ५३ हजार १३६ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३३ हजार ८०५ तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत १९ हजार ३३१ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन २०१६-१७ ते २०२२-२३ या कालावधीत ४३ हजार ६४६ चे उद्दिष्ट प्राप्त आहे. सर्व घरकुलांना मंजूरी मिळाली. यापैकी ३३ हजार ८०५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. ज्या लाभार्थीकडे स्वत:ची जागा नाही, अशा लाभार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५० हजारपर्यंतचे अनुदान देय आहे. राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे २२८७३ घरकुलांचे उद्दिष्ट असून १८०४९ घरकुलांना मंजूरी देण्यात आली. यापैकी १ हजार ३१७ घरकुल पूर्ण झाली. शबरी आवास योजनेचे उद्दिष्ट १४ हजार ५१६ असून मंजूरी ११२१२ तर पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या ५१३९ आहे.

आदीम आवास योजनेतून ३५६ घरे पूर्ण

जिल्ह्याला आदीम आवास योजनेचे उद्दिष्ट ७२३ आहे. यापैकी ५५६ घरकुलांना मंजूरी मिळाली. ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. पारधी आवास योजनेचे उद्दिष्ट ३५ असून ३२ घरकुलांना मंजूरी आणि १७ घरकुल पूर्ण बांधून झाले. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत २ घरकुल बांधण्यात आले. अशा एकूण राज्य पुरस्कृत विविध योजनांमधून ग्रामीण भागात १९ हजार ३३१ कुटुंबाना हक्काचा निवारा मिळाला आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाHomeसुंदर गृहनियोजनchandrapur-acचंद्रपूर