शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

६० शेततळ्यांनी डोंगरहळदी शिवार झाले जलमय

By admin | Published: July 29, 2016 12:55 AM

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवारातील आवश्यतेप्रमाणे जलसंधारणाची वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली आहे.

७४.५० टीसीएम पाणीसाठा : ५० हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी फायदा चंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शिवारातील आवश्यतेप्रमाणे जलसंधारणाची वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली आहे. पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी शिवारात बहुतांश शेतकरी धानाचे उत्पन्न घेतात. धानास मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासत असते. शिवारातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानातून तब्बल ६० शेततळे खोदण्यात आले आहे. या शेततळ्यांमुळे डोंगरहळदी शिवार जलमय झाले असून कोरडवाहू जमिनी हक्काच्या सिंचनाखाली आली आहे. तालुका मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरहळदी या गावात आदिवासी व अल्पभुधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवारातील जमिनी बहुतांश कोरडवाहू आहे. सिंचनाची सोय नसल्याने मान्सूनच्या पावसावर शेतकरी धानाचे पीक घेतात. पावसाने दगा दिल्यास धानाच्या पिकावरही पाणी सोडावे लागते. सिंचन व्यवस्था उपलब्ध झाल्यास खरीपातील धानाचे पीक चांगल्या पध्दतीने घेण्यासोबतच दुसरे व तिसरे पिकही शेतकऱ्यांना घेता येवू शकते. हा दृष्टीकोन समोर ठेवत कृषी विभागाच्या वतीने शिवारात तब्बल ६० शेततळ्यांचे क्लस्टर तयार करण्यात आले. यातील ४९ शेततळे अभियानातून या वर्षी बांधण्यात आले असून ११ शेततळे जुने आहेत. डोंगरहळदी या गावाची कोरडवाहू शेती अभियानातर्गतही निवड करण्यात आली आहे. शेततळ्यांसोबतच शिवारातील बोडी नुतनीकरणाची ४ व मजगीची कामेही करण्यात आली. त्यामुळे शिवारातील बहुतांश शेतकऱ्यांकडे आता हक्काचे सिंचन उपलब्ध झाले आहे. पूर्वी शिवारातील शेतकरी एकच पिक घ्यायचे आता. दोन ते तिन पीके घेता येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी) ५० हेक्टर क्षेत्राला पाणी शेततळ्यांमुळे शिवारात ७४.५० टीसीएम इतका पाणी साठा निर्माण झाला आहे. परिसरातील ५० हेक्टरला या पाणीसाठ्यातून एक प्रवाही पाणी पातळी देता येणार आहे. जलयुक्त अभियानातून झालेल्या या कामांचा परिसरातील आदीवासी व अल्पभुधारक शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे. साचलेल्या पाण्यातून डिझल पंपाव्दारे पाण्याची उचल करुन पिकास पाणी देता येईल. २० शेततळे हे ३० बाय ३० आकाराचे तर २९ शेततळे २० बाय २० आकाराचे बांधण्यात आले आहे. डिझल इंजिनचे प्रस्ताव शिवारात ६० शेतकऱ्यांकडे शेततळे झाले आहे. या शेततळ्यांतून शेतकऱ्यांना डिझल इंजिन लावून पाणी उचलता यावे व सिंचन करता यावे म्हणून आदिवासी विकास विभागाच्या योजनेअंतर्गत आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांना डिझल इंजिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या पाठपुराव्याने प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.